आज छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस…


(-११ मार्च १६८९-)
‘यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग !
लहू लसत सिंदुरसम खुब खेल्यो रनरंग
ज्यो रवि ससि लखतही, खद्योत होत बजरंग !
त्यो तुव तेज निहार के तखत त्यजो औरंग !!’
-(काव्य-कवी कलश)
अर्थात’ज्या प्रमाणे वीर हनुमानाला रावणाच्या सभेत बांधून कैद केले होते,त्याचप्रमाणे रणांगणावर प्रचंड पराक्रम गाजवून शेंदुराप्रमाणे रक्ताने न्हाऊन निघालेल्या हे महाप्रतापी शंभूराजा ज्याप्रमाणे सूर्य-चंद्राच्या प्रकाशामुळे काजवे निस्तेज होतात त्याचप्रमाणे तुझ्या प्रखर तेजामुळे निष्प्रभ झालेल्या औरंगजेबाने आपले सिंहासन त्यागले आहे.’
छत्रपती संभाजी महाराज कैदेत अडकले म्हणून अल्लाहचे आभार माणण्यासाठी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसमोरच गुडघे टेकले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत कैदेत असलेल्या कवी कलश यांनी भरदरबारातच औरंगजेबासमोर वरील काव्य रचून ते गायले.
ज्यांचा कर्तृत्व-शौर्यासमोर मृत्यूनेही गुडघे टेकले,साक्षात मृत्यूही ज्यांच्या मरण यातनांनी शहारला,भीमा-इंद्रायणीने दुःखावेगाने अश्रू ढाळले.
“भीमा-इंद्रायणी तिरी
वढु तुळा संगमावारी
मृत्युंजय संभाजी पाहून मृत्युही थिजला
बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला..”
नितीवान,चारित्र्यवान,बुद्धिमान,महापराक्रमी,धैर्यशील,
कर्तुत्ववान,थोर साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत