महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

त्यागमुर्ती रमाई माता

७फेब्रुवारी २०२४ जयंती निमित्त लेख

लेखक

श्रीकृष्णा घरडे

प्रत्येक महापुरूषाच्या कार्यामागे त्याच्या सहचरणी फार मोठा वाटा असतो. सर्वसासामान्य माणसाचा व त्यांच्या संसाराचा इतिहास होत नसतो तो इतिहास होत असतो असामान्य व्यक्तीचा अशाच असामान्य डाॅ बाबासाहेब आबेंडकराचा संसार करणारी थोर माता रमाई होय. रमाईचा जन्म ररत्नागिरी जिल्हातील दापोलीजवळील वणंद या गावी ७ फेब्रुवशारी १८९८ रोजी जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव भिकू व आईचे नाव रुक्खिणीबाई होते.लाहनपनीच रमाईच्या आई वडीलांचे निधन झाले लाहन रमाई व तिच्या तीन भावडांना तिचे काका वलगंकर व मामा गोविंदपुरकर मुंबईला गेले भायखाळा मार्केटच्या चाळीत ते राहत असत रमाईचा विवाह भीमराव रामजी आबेंडकर यांच्याशी ४ एप्रिल १९०६ रोजी भायखाळा भाजी मार्केट मध्धे झाला तो काळ बालविविहाचा असल्याने रमाई बाबासाहेबांचा विवाह सर्वमान्य होता. संसाराचा गाडा चालवित असतांना रमाईंना अनेक बिकट प्रसंगाना तोंड द्यावे लागले तिची व तिच्या कुटूंबाची वाताहात झालीती हलाखीच्या आगीत अक्षरश होरपळत होती. तिचे हाल पाहून डाॅ बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे जमा केले आणि रमाईला देऊ केले. परंतु ,स्वाभिमानी व जिद्दी रमाईने ते पैसे घेतले नाही ती आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पायबावडी,माहिम, दादरपर्यंत जात होती शेण वेचत बॅरिस्टरची पत्नी गोवर्‍या थापण्यासाठी जाते हे कोणाला समजू नये म्हणून किंवा दिसू नये म्हणून रमाई माता सुर्यादयापूर्वी घरातून बाहेर पडून वरळीला जात असे व रात्री अंधार पडल्यावर येत असे रमाई माता समजुतदारपणा कारुण्य उदंड मानवता आणि अथांग माया रमाईच्या अंतकरणात ओसंडून वाहत होती.तिने अनेक मरणे पाहिली आणि मरणे म्हणजे काय रमाईला पूर्ण समजले

प्रत्येक स्त्रिलाआपआपल्या संसारापुरते गणित बरोबर जमते, कळते रमाई शिक्षीत नसल्या तरी आपल्या संसारातील खर्चाचा हिशेब रमाई व्यवस्थित करीत असत डाॅ बाबासाहेब घरखर्चासाठी त्यांना ५० रू देत असत माता रमाई खर्चाची कगदी काटेकोर विभागणी करून ठेवीत. प्रत्येत दिवशी दिड-दिड रूपयाचा तीस पुड्या करून उरलेले पांच रुपये अटीतटीच्या खर्जासाठी बाजूला ठेवीत यातून त्याचे नियोजनबद्ध गृहीणीत्व सिद्ध होते रमाईला रमेश, इंदू, गंगाधर व राजरत्न ही चार अपत्य झाली परूतु चारही अपत्य एका पाठेपाठ मृत्यु झाले हे दु:ख सहन करणे फार अवघड होते परूतु माता रमाईने कसे सहन केले आपल्या कल्पना पलिकडचे आहे.रमाईनी उपाशी राहून भीमरावांना तेरा रूपये पाठविले होते. फार स्वाभिमानी होत्या. त्यानंतर डाॅ बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आले त्यांना समजले की रमाईने किती कष्ट हालअपेष्टा उपाशी राहून घर सांभाळले १९२३ ला लंडन विद्यापीठाने डी. एस. सी. ही पदवी डाॅ बाबासाहेबांना बाहाल केली आहे. त्याच प्रमाने
हा लेख श्रीकृष्णा घरडे यांनी लिहला आहे या लेख मद्धे माता रमाईचे त्यांचे बालपण आणि रमाई माता परिस्थितीला कशा प्रकारे त्रास सहन केला हा लेख लिहतांना किवा वाचन करतांना डोळे भरून येतात रमाईने पंढरपूरला जाण्याचा आग्रह धरला, रमाईमाताला बाबासाहेबांचे पत्र आले तेव्हा अश्रुचेपाट वाहुलागले असे या लेखा वर्णन केले आहे.आणि रमाईची प्रकृती खालावत होती अशा परिस्थितीत हवा पालट होण्यासाठी धारवाडला बलवंत वराळे सोबत माता रमाई गेल्या तेव्हा त्यांना कळले की, वसतीगृहात मुलांना अन्न नाही त्वरीत स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या त्यांनी काढून दिल्या तेव्हा मुलांना भोजनाची व्यवस्था केली केवढा त्याग माता रमाईचा एकदा आजारपणातच त्यांनी डाॅ बाबासाहेबांकडे पढंरपूरला विठोबाच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला देऊळात आपल्याला जाता येत नाही देन नावाची कोणतेही संकल्पना या विश्वात अस्तित्वात नाही आपण दुसरे तर पंढरपून निर्मान करूया, अशी समजूत डाॅ बाबासाहेबांनी काढली तेथे समानता असेल व सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश मिळेल रमाई स्वाभिमानी ,तेजस्वी आणि मृदू स्वभावाच्या होत्या

त्यांचे राहणीमान साधे व निटनिटके पणाचे होते.नम्रता स्वभाव होती त्याच प्रमाने औदार्य, ठामपणा होता. या त्यांच्या गुणापुढे डाॅ बाबासाहेब नतमस्तक होताना दिसतात रमाईची प्रकृती आजारपणामुळे ज्यास्त खालावत चालली होती शेवटी २७ मे १९३५ रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी रमाईचे निर्वान झाले डाॅ बाबासाहेबांचा आधारस्तंभ गेला व बाबासाहेब एकाकी पडले ,डाॅ बाबासाहेबांनी ‘थाॅट् स आॅ न पाकिस्तान ‘ हा ग्रंथ माता रमाईंंना २८ डिसेबंर १९४० ला अर्पण केला आहे.अशा या मातेच्याा ऋणातून, उपकारातून मुक्त होता येणारच नाही, रमाईच्या त्याग समर्पणाला निरागस मानतावादी – विचारात त्रिवार प्रणाम, डाॅ बाबासाहेबांनी रमाला पत्र पाठविले होते ते पत्र वाचून रमाईच्या डोळ्यात अश्रुचे पाट वाहु लागले डाॅ बाबासाहेबांवर हल्ला होण्याच्या भितीने रमाई अधिकच काळजी करू लागल्या पोटच्या चारही मुलांना पोरके झालेल्या या मातेने डाॅ बाबासाहेबांच्या पश्यात यशवंताची काळजी घेतली जाते , डाॅ बाबासाहेब आबेंडकर व माता रमाईच्या अपरिमीत त्यागाची व त्यांच्या कार्याला पुढे घेउन जाण्याची जबाबदारी त्याचे अनुयायी म्हणून सर्वाची आहे. आम्हाला मानुस म्हणून स्वभिमानाने या विश्वात जगण्याचा अधिकार ज्या थोर मातेने व बाबासाहेबांनी मिळवून दिला त्या मातात्र पित्यांप्रती आपण सदैव ऋणी असले पाहिजे त्यांनी घालून दिलेला आदर्श अन्याय त्यांच्या अनुयायांनी जपला पाहिजे अन्याय लढले तरच पण अत्याचाराविरूद्ध खबीरपणे, निर्भिडपणे लढले पाहाजे त्याच प्रमाणे समाजाला योग्य दिशा देण्याचे माहन कार्य करण्यासाठी तत्पर असले पाहिजे आजच्या महिलांवर फार मोठी जबाबदारी आहे अज्ञान, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, व्रत, वैकल्य, उपवास असे आधारहीन असलेले व अज्ञानात ढकलून देणारे हिंदू सण, ऊत्सव करणे बंद केले पाहिजेत कर्मकांड व काल्पनिक दैववाद झुगारून दिला पाहिजे आजही आपल्या स्त्रिया हिंदू सनाची पाठराखन करून त्यांना साथ देण्याचे काम करतात त्यामुळे परिवर्तन कसे घडनार ? सडेतोड बोलावे लागेल तरच धम्मातील सत्य काय हे कळू शकेल तरच या मातेला त्यांच्या १२६ जयंतीनिमित्त खर्‍या अर्थाने आपली विनम्र अभिवादन

लेखक
श्रीकृष्णा घरडे
महाराष्ट्र राज्य शासन काष्टट्राईब कल्यान महा संघ
अतिरिकमहा सचिव
फुले शाहु आबेंडकर विद्वत्त सभा विदर्भ सघंटक कार्यकर्ता
वचित बहुजन आघाडी सदश्यय

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!