
भारतीय चमू वरुण तोमर,अर्जुन सिंह चिमा आणि उज्वल मलिक यांनी १ हजार ७४० गुण नोंदवले.इराणला रौप्य तर कोरियाला कांस्य पदक मिळाले. याच प्रकारात भारताच्या महिला खेळाडूंनीही पॅरिस ऑलिंपिकमध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. इंडोनिशियाची राजधानी जकार्ता इथे सुरु असलेल्या अशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताच्या पुरुष नेमबाजांनी १० मीटर एखर पिस्तोल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. जकार्ता मध्ये सध्या २६ देशांचे ३८५ खेळाडू पॅरिस ऑलिंपिकमध्ये आपले स्थाने निश्चित करण्यासाठी संघर्ष करत आहेत.भारतानं रायफल,पिस्तोल आणि शॉटगन या प्रकारात याआधीच पॅरिस ऑलिंपिकसाठी १३ जागा मिळवल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत