शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.

टाकाळा येथील माळी कॉलनीत शाळकरी मुलाने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्यन देवीदास पालवे (वय १५, सध्या रा. टाकाळा, कोल्हापूर, मूळ रा. एसएनडीटी कॉलेजसमोर, पुणे) असे त्याचे नाव आहे.याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. अभ्यासाच्या तणावातून की अन्य कारणातून आत्महत्या केली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, आर्यनची सध्या चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता. काल (सोमवार) दुपारी त्याची आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरुममध्ये होता. त्याला हाक दिल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आईने त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.
पोलिसांनी सांगितले की, आर्यनची सध्या चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता. काल (सोमवार) दुपारी त्याची आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरुममध्ये होता. त्याला हाक दिल्यानंतरही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आईने त्यांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला.
तेव्हा आर्यनने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आर्यनचे वडील बँकेत अधिकारी आहेत, तर आई शिक्षिका आहे. तो इयत्ता नववीत शिकत होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत