महायुतीला ओबीसी मतदार नको आहेत का ? – गजू घोडके यांनी बोलून दाखवली नाराजी

नाशिक : छगन भुजबळ ज र लोकसभेत गेले असते तर समाजाचे प्रश्न अत्यंत प्रभावी पणे मांडले असते, समाजामध्ये खूप सकारात्मक संदेश गेला असता, परंतु भाजपा ला या सगळ्याची गरज नसल्यासारखं वागत आहेत अशी खंत व्यक्त करत सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी महायुतीच्या राज्यातील नेत्यांचा निषेध नोंदविला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी सूचना करूनही ‘महायुती’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे महायुतीला ‘ओबीसीं’च्या मतांची गरज आहे, की नाही असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि ‘ओबीसीं’साठी काम करणाऱ्या घोडके यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भुजबळ यांनी निवडणूक लढवावी अशी सूचना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती. त्यास भाजपच्या राज्यातील नेत्यांनीदेखील दुजोरा दिला. त्यामुळे भुजबळांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती; परंतु त्यानंतर सुमारे तीन आठवडे उलटूनही महायुतीच्या राज्यातील नेत्यांकडून भुजबळांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकली नाही. प्रचारासाठी पुरेसा वेळ हाती नसल्याने अखेर भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका स्वीकारली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत