महामानवाचा प्रखर संदेश..! ४ ऑक्टोंबर दिन विशेष.

बाबासाहेब आंबेडकर ४ ऑक्टोंबर १९४५ ला म्हणाले,मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की,आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उध्दार होणे शक्य नाही.राजकीय सत्ता हे प्रभावी शस्त्र आहे म्हणून आपण या शस्त्राची पूजा करावयास पाहिजे.म्हणजे या शस्त्राचा उपयोग आपल्या शत्रूवर करता येईल.आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल तर सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे.राजकीय सत्ता मिळविणे हे निवडणुकीवर अवलंबून आहे.म्हणून निवडणूक आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे.निवडणूक आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.यात आपण यशस्वी झाले पाहिजे.त्याकरिता हा लढा जिंकण्यासाठी आपण जय्यत तयारी केली पाहिजे.राजकीय सत्तेशिवाय आपणास काहीच करता येणार नाही.त्यासाठी आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे.आपला जो नाश झाला आहे,आपण हजारो वर्षांपासून खितपत पडलो आहोत त्याचे कारण आपणास राजकीय सत्ता नाही.सत्ता ही अजब शक्ती आहे म्हणून ती मिळविली पाहिजे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( 04 ऑक्टोबर 1945 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत