
दोन महिन्यांपूर्वी ठाणे व आता नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्येही रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काल रात्री पुन्हा सात जणांना मृत्यू झाला. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला. चिंताजनक बाब म्हणजे या मृतांमध्ये बालकांचे प्रमाण अधिक आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुलांच्या औषधासाठीच पैसे नाहीत केवळ आपल्या प्रचारासाठी भाजप सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, याच सरकारकडे मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत