गुलाम मानसिकतेच्या पुरोगाम्यांसाठी….!!

फुले आंबेडकरी नेत्याने,स्त्रीवादी कार्यकर्त्यांने ओरडून ओरडून आणि जीवाचा आकांत करुन, अनुभव कथन करुन गेल्या ३५-४० वर्षापासून सातत्याने सांगितले की, मनुस्मृती मध्ये भेदभावाची मुळं रुजली आहेत तर ते पटतं नाही. किमान कान देऊन ऐकावं असं सुद्धा तुला वाटतं नाही…!!
मात्र राहुल गांधी या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या सवर्ण नेत्याने एकदाच एका स्टेजवरुन सांगितले की, मनुस्मृती मध्ये भेदभावाची मुळं रुजली आहेत तर तुला राहुल गांधी मध्ये संविधान वाचविणारा मसीहा दिसतो. राहुल गांधी च्या वैचारिकते मध्ये तुला फुले आंबेडकरवाद जाणवतो. राहुल गांधी एकटा मनुवाद्यांना टक्कर देऊ शकतो अशी तुझी धारणा बनतेय. राहुल गांधी यांच्या मनाचा तुला लगेच ठाव लागतो आणि समाजात बदल घडणार याची स्वप्न तुला पडतात….!!
फुले आंबेडकरवादी स्त्रीवादी नेता, कार्यकर्ता कितीही वैचारिक आणि विवेकी भूमिका घेऊन सांगतं आणि मांडतं असेल तरीही तुला त्याची किंमत वाटतं नाही, त्यामधील सत्यशोधन करावे असे सुद्धा तुला वाटत नाही. ही तुझ्या मनातील कमालीची उदासिनता आणि सवर्ण नेत्याने एकदाच मांडलेल्या मुद्यावर तुझा ऊताविळपणा काय दर्शवितो.??
भलेही तु स्वतः ला पुरोगामी म्हणवून घे परंतु….
तुझ्या मनातील फुले आंबेडकरवादी आणि सवर्ण यांच्या मधील भेदभावाची रेषा तु दाखवून देतोस. खरं म्हणजे तुझ्या सवर्णा प्रती लाचार आणि गुलाम मानसिकतेचं हे लक्षणं आहे. त्याचे कारण असे की, एकच बाब दोन लोकांनी सांगितली, त्यापैकी एकाने सातत्याने गेली चाळीस वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून वैचारिक आणि विवेकी भुमिका घेत आणि दाखले देऊन सांगितली पण तु ऐकले नाही कानाडोळा केला. का.? कारण तुला सत्य असेल तरीही त्याच्या तोंडून ऐकायचेच नव्हते,आणि पटून सुद्धा घ्यायचेच नव्हते. ही उदासीनता तुझ्या मनात आली कोठून.? ही उदासीनता सुद्धा तुझ्या डोक्यात भिनवली जातीयवादी मानसिकतेच्या मनुस्मृती मधील शिकवणुकीने ….!!
तेचं विधान सवर्ण नेत्याने एकदाच केले की, त्या विधानातील सत्य तुला लगेच ऊमगते हे कशामुळे.? तुला सवर्ण नेता स्विकारायचा असतो. तुला सवर्ण नेत्याची गुलामी करणे आवडते. तुला सवर्ण नेत्याची जु हुजुरी करणे सन्मानास्पद वाटतेय ही मानसिक लाचारी आहे याचे तुला भान आहे का.??
ढोंगी पुरोगाम्यांचं एक लक्षणं असं आहे.की, त्यांची अवस्था म्हणजे
आपणं नेतृत्व करु शकतो हा आत्मविश्वास गमावलेली आणि खचलेल्या मनाची ही माणसं मुठभर सवर्णांची गुलामी करण्यात धन्यता मानतात आणि सवर्णांमध्ये नेतृत्व शोधतात….!!
त्याचं दुसरं लक्षणं असं की, ते भलेही पुरोगामी म्हणून समाजात मिरवतात परंतु अंतर मनात प्रचंड जातीयवादी मानसिकतेचे असतात म्हणून त्यांना हलक्या जातीच्या विद्वान माणसाने सत्य कथन केले तरीही ते ऐकतं नाहीत आणि पटवून सुद्धा घेत नाहीत…!!
त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेला विचार म्हणजे हा हलक्या जातीचा, तो मोठ्या जातीचा. ही जात निच ती जात ऊच्च, वगैरे. वगैरे…!!
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झालीत. देशातील सत्ता मुठभर सवर्णांच्याच हातात का असतेय त्यापैकी एक कारण म्हणजे जातीयवादी गुलाम मानसिकतेचे ढोंगी पुरोगाम्यांची ही दुटप्पी भुमिका….!!
८५% विरुद्ध १५% ही थिअरी यशस्वी का होतं नाही.? त्याचे कारण असे की,
*संख्यात्मक बळ बघून एकीकरण होतं नाही तर वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर मानसिकता ही अद्यापही जातीच्या डबक्यात गटांगळ्या खातं आहे. ती प्रगल्भ होत नाही. *सत्ताधारी होण्यापेक्षा सवर्णांची गुलामी श्रेष्ठ वाटतेय.* नेतृत्व गुण विकसित व्हायला अजून किती वेळ लागेल.??
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


