
🥺……… 🥺
" जाती धर्माच्या कोरड्या अहंकारामुळे त्यातल्या त्यात आमच्या देशात *हिंदू धर्म* लोकसंख्येने सर्वात मोठा आहे ( जगात अल्पसंख्यांकच आहे). याच धर्माच्या मूळ तत्वज्ञानात *सोमरसाला* देवानीच परवानगी दिल्याने अनैतिकतेचे स्तोम माजून भारतीय बहुसंख्यांक जनता सदविचारी न बनता गुलाम बनण्यास लवकर तयार झाली. म्हणूनच भारतावर जगात सर्वात जास्त परकीयांची राजकीय आक्रमणे झाली. परंतु येथील अल्पसंख्यांकांनी अल्पकाळच का असेना पण नेहमीच टोळ्या टोळ्यांनी मिळून का होईना परकी्यांना कुटनीती विरुद्ध विवेकाने आणि गरज पडली तर शस्त्राने सळो की पळो करून सोडले होते आणि आपला राष्ट्रवाद जपला होता.
यामध्ये थोर क्रांतिकारक छ. शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्यामामा भिल्ल, पृथ्वीराज चव्हाण, रणजित सिंग,सम्राट चंद्रगुप्त मोर्य, सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन, राजा अंभी यांच्यासारखे कितीतरी राजे होऊन गेले. शेवटी अल्पसंख्यांक नेहमीच बरोबर असतात आणि बहुसंख्यांक नेहमीच चुकीचे असतात हे समीकरण भारताला लागू झाले.
जाती धर्माच्या कोरड्या अहंकाराच्या दोरीने बसहुसंख्यांक भारतीय जनतेला बांधता येतं. त्यांना गुलाम बनवता येतं. परंतु , मानवतावादी / राष्ट्रवादी अल्पसंख्यांकांवर हा प्रयोग कधीच यशस्वी होऊ शकला नाही, होऊ शकत नाही. हा आजवरचा भारतीय प्राचीन इतिहास आहे. म्हणूनच आजपर्यंत या कुटनीतीच्या कुसांस्कृतिक परकीय आक्रमनाला आणि इतर परकीय राजकीय आक्रमणाला जो शह दिला तो या अल्पसंख्यांकांनीच.ते ही केवळ आणि केवळ आदर्श महापुरुषांच्या विज्ञानवादी, विवेकवादी अर्थात मानवतावादी तत्वज्ञानामुळेच.
आजही 15 ऑगस्ट 1947 च्या स्वातंत्र्यानंतरच्या संविधानक्रांतीनंतर अल्पसंख्यांकामुळेच ही लोकशाही आणि संविधान अर्थात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही लोकशाही मूल्ये कसेबसे का होईना टिकून आहेत.
साधा विचार करा की गेल्या 75 वर्षात आमच्या देशात आर्थिक समता का स्थापन होऊ शकली नाही. एकीकडे नीतिमत्ता जपत आलेला आमचा जगाचा पोशिंदा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतो तर दुसऱ्या बाजूला अनितिमान असलेले भांडवलदार मात्र लाखो कोटी रुपयांनी सरकारी बँकांना बुडऊन खुशाल दुसऱ्या देशात ऐषाआरामाचे जीवन जगतात. आर्थिक विकासाच्या खोट्या गप्पा मारणारे सरकार आणि नकली अर्थतज्ञ् यांच्या कपाळकरंटेपणामुळेच देशाचे राष्ट्रीय आणि दरडोई निव्वळ उत्पन्न न होता राष्ट्रीय आणि दरडोई निव्वळ कर्ज झाल्यामुळेच भारत देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा, भांडवली बाजाराचा आणि इतर आर्थिक महासत्तांचा कर्जबाजारी झाला. तेंव्हा या भारताची आत्महत्या कशी असेल……?
अशी आत्महत्येची वेळ भारतावर का आली…..?
कारण…….
या सर्वच आजपर्यंतच्या केंद्रीय आणि प्रादेशिक सत्ताधाऱ्यांनी तसेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळानी 100% देश संविधानावर चालवीला असता……….
आणि सर्वसामान्य जनतेनी सत्ताधाऱ्यांना तसे करायला भाग पाडले असते……..
तर ही देशावर आत्महत्येची वेळ आलीच नसती…!
परंतु , अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक जनता सुद्धा विविध लहान मोठे राजकीय राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष व संघटना यांच्या विविध विचारसरणीत ( स्वार्थी ) गुंतल्यामुळे संविधानातील कोहिनुर हिरे ओळखण्यात ती कमी पडली. अगदी ज्या महापुरुषाने अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्यात सर्वात महान आणि प्रथम कार्य जे केले, ते म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती. त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेकरं सुद्धा या संविधानक्रांतीला गहनपणे समजून न घेता विविध पक्ष व संघटनेत गुंतल्यामुळे त्यांचा वैचारिक वारसा जपू शकले नाहीत. हीच खरी शोकांतिका आहे. केवळ संविधान घरात ठेऊन, त्यांच्या फोटोला हार घालून वंदन केल्याने आणि राजकीय नेत्यांच्या प्रति विभूतीपूजा केल्याने काय होणार? तर उलट संविधान आणि लोकशाहीला संपवण्याचेच हे कटकारस्थान ठरेल. अर्थात आमच्याच हाताने स्वतःचा गळा घोटण्याचे काम आम्ही करतोय. हेच सिद्ध होते.
शेवटी कोणतेही महापुरुष किंवा तत्ववेत्ते काय करतील तर ते एक मार्गदर्शनात्मक वैचारिक क्रांतीच करतात. परंतु , त्या विचाराला आचरणातून स्वीकारून निदान आपण स्वतः आपल्यासाठीच या क्रांतिकारक विचारांचा मार्गदर्शन म्हणून लाभ जरी घेत एक माणूस म्हणून जगत आलो , तरी सुद्धा त्या महापुरुष आणि तत्व वेत्त्यांना त्यांच्या क्रांतीचे समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे मानवतेसाठी संघर्षातुन समर्पीत केलेले असते, म्हणून………!
आणि आज गेल्या 75 वर्षात आमच्या देशातील संपूर्ण महापुरुष आणि तत्ववेत्ते शापित झालेले दिसतात. याला जेवढी व्यवस्था आणि जनता जबाबदार आहे. तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच RSS जबाबदार आहे. यातून बाहेर पडून जर देशाला वाचवायचे असेल, तर केवळ आणि केवळ एकच करावे लागेल की भलेही आपल्या देशातील महापुरुष, तत्ववेत्ते आणि क्रांतीकारकांची त्यांच्या प्रतिमेची, स्मारकांची पूजा करू नका, मेणबत्ती / अगरबत्ती लावू नका, त्यांना पुष्पहार घालू नका, त्यांना वंदनही करू नका, त्यांचा चेहराही डोळ्यासमोर येऊ देऊ नका. त्यांची जयंती स्मृतीदिन कायमचे विसरून जा, त्यांना मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून गुगलवर सर्च करूच नका. त्यांचे जात धर्म सुद्धा पाहू नका……………..
परंतु , त्यांची स्वातंत्र्य समता, न्याय आणि बंधुताविषयीची क्रांती त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि इतर ग्रंथातून ( जागृतीचे ग्रंथच केवळ वाचून, ययाति सारखे वाचून काहीही होणार नाही उलट पुन्हा गुलामीचीच मानसिकता होईल ) वाचा त्यांचे हृदय समजून घ्या…….. 🙏
तेंव्हाच आपण या देशाचे आणि मानवतेचे, निसर्गनियमांचे शत्रू असणाऱ्या RSS ला कायमचे हटवू शकू.
आमच्या भारतीय जनतेची मानसिकता कशी गुलामीची झाली आणि त्याबद्दल आवाज सार्वजनिक उठवणे तर सोडाच साधा विचार सुद्धा करत नाही. हीच खरी शोकांतिका आहे. उलट तसा विचार करणाऱ्याला किंवा आवाज उठवणाऱ्यांना मुर्खात काढते. आहे की नाही खरे देशाचे दुर्दैव……..?
उदाहरणच बघा, आमच्या देशाच्या व राज्याच्या सरकारी तिजोरीत केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेचाच पैसा जमा होतो. त्यातील प्रत्येक रुपयात सामान्याचा बौद्धिक आणि शारीरिक घाम असतो. परंतु आमच्याच पैश्यातुन भ्रष्टाचार करून तिजोरी सांभाळणारी सत्ताधारी मंडळी आणि विरोधी मंडळीच आम्हालाच भिकेला लावून प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे कर्जबाजारी करून आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडत असेल तर आम्ही अन्याय सहन करणार की आत्महत्या करणार….?
परंतु , या RSS ने आमची अंधश्रद्धा आणि कर्मकांडाची मानसिक बनवून गुलाम बनवल्यामुळे बहुसंख्यांक जनता गुलाम झाल्यानेच आमच्या देशाची आज ही बिकट अवस्था झाली. हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही.
आता हेच पहा ना, आमच्या देशाचा निरव मोदी याने 14, 000 कोटी रुपयाचे बँकेचे कर्ज बुडवून लंडनला पळाला आणि तिथे ऐशारामाचे जीवन जगत आहे. त्याचप्रमाणे मेहुलकुमार चौकसे याने 8516 कोटी रुपये बुडवून पळाला आणि अँटीग्वा देशाचे नागरिकत्व स्वीकारून तिथे ऐष करतोय. तसेच विजय मल्ल्या 9000कोटीचे व्याजासहित 22065 कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये ऐष करतोय. त्याचप्रमाणे नितीन/ चेतन संदेसरडा ही जोडी SBI चे 8100 कोटी रुपये बुडवून लंडन मध्ये ऐष करतोय. जतीन मेहता 6000 कोटी रुपये बुडवून लंडनमध्येच ऐष करतोय. ललित मोदी 125 कोटी रुपये लंडनमध्ये ऐष करतोय. असे कितीतरी जे अजून पटलावर आलेले नाहीत असे शेकडो लोक विदेशात पलायन करून ऐष करताहेत.
आत्ताचे अगदी कालचेच उदाहरण घ्या. ZEE समूहाचे मालक सुभाषचंद्र यांच्याकडील 22000 कोटी रुपयाचे असलेले कर्ज मोदी सरकारने 99.97% माफ करून टाकले………!
आणि केवळ 6.5 कोटी रुपयेच फेडायला सांगितले तेही हप्त्या हप्त्यात…….!
मग विचार करा आमची (सर्वसामान्य भारतीय जनतेच्या घामाचा पैसा ) या व्यवस्था मनमानी करून देशाला व आम्हांला देशोधडीला जर लावत असेल तर हे सर्व आम्ही हा अन्याय निमूटपणे सहन करणार का…….?
मी ( लेखक ) तर नाही……
तुम्ही………?
त्यासाठी या व्यवस्थेला हादरा द्यायचा असेल तर प्रथम प्रथमोपचार म्हणून EVM ला मुळासहीत उखडून फेकू आणि मग RSS ची शस्त्रक्रिया करून मनुवाद कायमचा उखडून फेकू.
त्यासाठी 1947 प्रमाणेच एका नव्या स्वातंत्र्यासाठी बलिदानाची तयारी ठेवावी लागेल…… 🙏
मी तर ठेवलेली आहे…….
तुम्ही……..????
सूचना :- माझ्या ब्रॉडकास्ट व्हाट्सअप ग्रुपनुसार मला केवळ महिन्यातून तीनच पोस्ट किंवा व्हिडीओ तुमच्या प्रत्येकाच्या वयक्तिक फोनमध्ये पाठवू शकता येतात. त्यापेक्षा जास्त नाही पाठवू शकत. आणि केवळ महिन्यातून तीनच पोस्ट नुसार संविधानजागृती RSS किंवा EVM ला हटविण्यासाठी पुरेशा नाहीत. म्हणून मी आता माझ्याकडे जे 200 व्हाट्सअप ग्रुप्स आहेत त्यावर मी सतत पोस्ट व्हिडीओ अपलोड करणार आहे. तेंव्हा तुम्ही ज्या ग्रुपवर असाल तिथून तुम्ही या पोस्ट आणि व्हिडीओ वाचून ऐकून समजून घेऊन संग्रह कराव्यात……. 🙏
आवाहनकर्ता आणि लेखक :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


