बौद्धांनी “वंदे मातरम” का म्हणावे ? सतीश केदारे

केंद्र सरकारच्या गृह खात्याने 9 जुलै 2026 रोजी ” वंदे मातरम” गीतासंबधी आदेश निर्गमित करून “जनगण मन” या राष्ट्रगानाप्रमाणे राष्ट्रगीताचा दर्जा दिला आणि 6 ऑगस्ट 2026 रोजी राजपत्र जारी करून सदर गीतास भारताच्या संसदेने जुलै २०२६ मध्ये मंजूर केलेल्या राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) कायदा, २०२६ नुसार राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. तत्पूर्वी सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्थान इत्यादी स्थळी ” वंदे मातरम ” राष्ट्रगीत गायले जावे अशा मार्गदर्शक सूचना 11 फेब्रूवारी 2026 रोजी केंद्र सरकारच्यावतीने जारी करण्यात आल्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी संसदेत राष्ट्रपतींनी वंदे मातरम गीतास “जन गण मन ” गीताप्रमानणे दर्जा घोषित केला होता, तदनुसार वंदे मातरमचे दोन छंद गाण्याचा प्रघात होता, नव्या आदेशानुसार सर्व सहा छंद गाण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर लेखातील मांडणी राज्यघटनेस अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.
मुळात “वंदे मातरम” गीत हे बकिंमचन्द्र चट्टोपाध्याय यांच्या “आनंदमठ “(1882) या कादंबरीत प्रकाशित झाल्याचे भारत सरकार अधीनस्थ प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या 6 नोव्हेम्बर 2025 च्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे आणि “आनंदमठ” कादंबरीने देशभक्तिचा धर्म निर्माण केल्याचे म्हटले आहे. तसेच लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा गौरव केला आहे. सदर गीत आनंदमठात प्रकाशित होण्यापूर्वी देखील हे गीत गायले जात होते असे अनेक लेखकांनी म्हटले आहे आणि तर काही लेखकांनी वंदे मातरम हे गीत स्वंतत्र रचले गेले असून दुर्घटनेने आनंदमठात सामाविष्ट झाल्याचे म्हटले आहे, त्यात दोन छंद अगोदर रचले गेले आणि उर्वरित चार छंदासह आनंदमठात प्रकाशित झाले असा युक्तिवाद देखील केला जातो. वंदे मातरम एकूण सहा छंदात असून विवादाच्या पार्श्वभूमीवर कांग्रेसच्या 1937 च्या कलकत्ता अधिवेशनात यातील केवळ दोन छंद गाण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. 1950 साली देखील राष्ट्रपतींनी वंदे मातरम गीतास ‘जन गण मन ” या राष्ट्रगानाप्रमाणे राष्ट्रीय दर्जा दिला होता.
नरेंद्र सेन गुप्ता यांनी 1906 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कांदम्बरीच्या इंग्रजी भाषेत केलेल्या भाषांतराच्या आवृत्तीत एका प्रकरणात “आनंदमठाच्या” संदर्भाने जो उल्लेख केला आहे त्यात प्रशस्त भूखंडावर असलेल्या पुरातन बुद्ध विहाराच्या जागेवर हिंदु मठास रूपांतरित केल्याचे म्हटले आहे, ज्या स्थळी भग्न झालेले दगड अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे म्हटले आहे. कादंबरी हा गद्य साहित्यातील प्रकार आहे, ज्यामध्ये काल्पनिक, वास्तव किंवा संमिश्र कथांचे चित्रण असते. प्रश्न येथे हा उपस्थित राहतो देशभक्ति हा धर्म मानणाऱ्या बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना बुद्ध विहार नष्ट करून हिन्दू मठ निर्माण करण्याच्या वस्तुस्थितीचे अथवा कल्पकतेचे उद्दात्तीकरण करणे गरजेचे का वाटावे ,जर कांदम्बदरी देशभक्ति आणि राष्ट्रभक्तिकरिता प्रेरणा मिळावी म्हणून लिहिली असेल तर त्यात धार्मिक संघर्षवाद का निर्माण केला गेला हा प्रश्न अनुत्तरितच आहे. बौद्ध हिंदू संघर्षात अनेक बुद्ध विहारे नष्ट झाली,अनेक बौद्ध विहारावर कब्जा झाला हे सर्वश्रुत आहे म्हणून देशभक्तिची भावना दर्शवीणाऱ्या कथानकामध्ये त्याचे उदात्तीकरण करणे हे धार्मिक संघर्षवादाचे प्रतीक आहे. देशभक्ति,राष्ट्रप्रेम या बाबी धर्मनिरपेक्षतेच्या कसोटीवर उतरणाऱ्या असतील तरच त्या कृतिशील ठरू शकतील.
आनंदमठाच्या दुसऱ्या एका प्रकरणाच्या संदर्भात एका संवादामध्ये “संतान (विद्रोही सैन्य )वैष्णव असल्याचे नमूद करीत असतांना वैष्णव पंथ हा खरा अहिंसावादी नसल्याचे म्हटले आहे” संवादात महेंद्र म्हणतो “मला हे कसे आहे ते समजत नाही. रक्तपात टाळणे हा वैष्णवांचा गुणधर्म मानला जातो, तर ‘संतान’ वैष्णव कसे असू शकतात? सत्यानंद म्हणतो “ते चैतन्याचे वैष्णव मत आहे. ते नास्तिक बौद्धधर्माच्या
अनुकरणाने वाढलेल्या खोट्या वैष्णववादाचे मत आहे. “
खऱ्या वैष्णववादाचा आदर्श हा वाईटांना शासन करणे
आणि मातृभूमीचे रक्षण करणे आहे; कारण आमचे
आराध्य दैवत हे विश्वाचे रक्षक आहे. जग वाचवण्यासाठी तो दहा वेळा अवतार घेऊन आला. केशी, हिरण्यकशिपू, मधु, कैटभ, मुर आणि नरक यांसारख्या राक्षसांना, रावणाप्रमाणे राक्षसांना आणि कंस व शिशुपालासारख्या अत्याचारींना त्याने लढून मारले. तो विजेता आणि विजयाचा
दाता आहे. तो जगाचा तारणहार आणि ‘संतानाचा’ आराध्य देव आहे. चैतन्याचा वैष्णववाद खरा वैष्णववाद नाही, तर फक्त अर्धाच खरा आहे. त्यांचा देव फक्त प्रेम आहे; पण खरा देव फक्त प्रेम नसून अनंत शक्तीही आहे. चैतन्याचा विष्णू सगळा प्रेममय आहे, आमचा विष्णू सगळा शक्तीमय आहे.”
वरील संदर्भात बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी बौद्ध धर्माच्या अनुकरणाने खोटा वैष्णववाद निर्माण झाल्याचा भ्रम पसरविला आहे , बुद्धाने जगाला जे अहिँसावादी तत्व दिले आहे ते राष्ट्रसंरक्षणास कधीही बाधा ठरु शकलेले नाही. बुद्धाच्या शिकवणीनुसार प्रजेचे रक्षण करणे राज्याचे कर्तव्य आहे. सैन्यातील सैनिकांना उपसंपदा देणे बुद्धाने वर्ज्य ठरविले होते. आणि दूसरी बाब म्हणजे वैष्णव पंथास हिंसावादी ठरवणे हे अत्यंत दुर्दैवीपणाचे लक्षण आहे,समस्त वैष्णव पंथाने मानवतावादी मुल्यांचा स्वीकार केला असून त्यांनी प्रेमानेच जग जिंकले आहे.
आनंदमठातील दुसऱ्या संदर्भातील वरील परिच्छेदात विष्णुच्या दहा अवताराबाबत आपण चर्चा केली ज्यावरुन आपणास आनंदमठातील संघर्ष हा राष्ट्रहितावर वा देशभक्तिवर कायम न राहाता तो धार्मिकतेकड़े झुकणारा आहे असे निदर्शनास येईल. त्यामुळे आनंदमठ ही कृती राष्ट्रीयत्वे ऐवजी धार्मिकतेवर जास्त भर देते असे दिसते.
ज्या आनंदमठात बौद्ध धर्माच्या विहाराच्या तोडफ़ोडीचे उदात्तीकरण केले असेल, बुद्धाच्या आणि वैष्णवांच्या अहिंसावादावर टिका केली गेली असेल, एका विशिष्ट धर्माचे उदात्तीकरण केले असेल तर , कट्टर धार्मिकता निर्माण करणाऱ्या “आनंदमठ ” या कादम्बरीतील वंदे मातरम गीतास राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला असेल तर ही निश्चित चिंतेची बाब असु शकते ? आणि यामुळे राष्ट्राची धर्मनिरपेक्षता देखील धोक्यात येण्यास कारणीभूत ठरू शकते ? .
वंदे मातरम आणि नवबौद्ध
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा देताना अनुयायांना 22 प्रतिज्ञा (बावीस प्रतिज्ञा) दिल्या होत्या. वामनराव गोडबोले यांनी त्यांच्या बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म दिक्षेचा अविस्मरणीय क्षण या पुस्तकात डॉ आम्बेडकरांची भूमिका विशद केली आहे, त्यात 22 प्रतिज्ञा देण्यामागे नवबौद्धांची अर्थात भोळया बाभडया जनतेची फसवणूक होऊ नये, सनातनी लोक रामकृष्णाच्या मंदिरात बुद्धाची मुर्ति बसवतील आणि दिशाभूल करतील , त्यामुळे त्यांना 22 प्रतिज्ञा ग्रहण करून, धम्मदीक्षेची विधी निश्चित करण्यात आली होती.
13 ऑक्टोम्बर 1935 साली येवला येथे डॉ आंबेडकर घोषणा करतात ” जरी मी हिन्दू म्हणून जन्माला आलो परंतु हिन्दू म्हणून मरणार नाही.”
14 ऑक्टोम्बर 1956 साली धम्मदिक्षा कार्यक्रमात भाषणात डॉ आंबेडकर म्हणतात ” तुम्ही आतापर्यंत देवदेवतांची पूजा करीत होते व भक्तिभावाने त्यांना वश करण्यासाठी धार्मिक कार्यात गूंग होते. पण देवदेवतांनी तुमचा कोणताही उद्धार केला नाही. अस्पृश्य हे देखील आपल्या सारखी माणसे आहेत,ते आपले धर्मबांधव आहेत,अशी भावना हिंदुना झाली नाही. उलट त्यांनी अस्पृश्यांना गर्तेत लोटुन दिले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केलेत. हजारो वर्षापासून त्यांना गुलामाप्रमाणे वागविले.
15 ऑक्टोम्बर 1956 रोजी डॉ आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात “मला इतका आनंद झाला आहे की नरकातुन सुटलो असे मला वाटते.
सदर 22 प्रतिज्ञामध्ये
प्रतिज्ञा क्रमांक 3 मध्ये हिन्दू धर्मातील कोणत्याही देव देवतांना मानणाऱ नाही,त्यांची पूजा करणार नाही.
प्रतिज्ञा क्रमांक 4 मध्ये ईश्वराने अवतार घेतला यावर विश्वास ठेवणार नाही.
प्रतिज्ञा क्रमांक 5 मध्ये बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे हा खोटा प्रचार आहे.
प्रतिज्ञा क्रमांक 19 मध्ये जुन्या हिंदु धर्माचा त्याग करणे समाविष्ट आहे.
आनंदमठात विष्णुच्या दहा अवतारांची चर्चा आहे आणि डॉ बाबासाहेब आम्बेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अनुसार सदर प्रचार खोटा आहे. वंदे मातरम या गीतात दुर्गा, कमला,सरस्वती या व इतर देवी देवतांचा उल्लेख आढळतो आणि तो जरी उपमा हेतुने आला असेल, परंतु त्यामुळे सदर गीतातून अप्रत्यक्षरीत्या सदर देवदेवतांची उपासना करण्यास भाग पाडल्याची भावना इतर धर्मियांच्या मनात निर्माण होऊ शकते ?.
वंदे मातरमच्या पहिल्या दोन छंदाव्यतिरिक्त उर्वरित छंदात हिंदु देवदेवतांचे उदात्तीकरण असल्यामुळे नवबौद्धांनी ते ग्रहण केल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन होत नाही हे निश्चित आहे. डॉ बाबासाहेब आम्बेडकरांनी दैववाद सपशेल नाकारला असतांना वंदे मातरमच्या माध्यमातून दैववाद स्विकारणे नवबौद्धांना अडचणीचे व पुन्हा एकदा वर्णवादी व्यवस्थेकड़े दिशानिर्देश करणारे ठरू शकते ?.
वंदे मातरम आणि धर्मनिरपेक्षता
आपण पाहिले वंदे मातरम गीत विशिष्ट धर्माचे उदात्तीकरण करते आणि विशेषता 1906 मध्ये हिन्दू मुस्लिम यांच्यात वंदे मातरम मुळे विवाद उत्पन्न झाल्याचे सब्यसाची भट्टाचार्य यांनी वंदे मातरम बायोग्राफी या पुस्तकात म्हटले आहे. 1857 च्या क्रांतिमध्ये देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी उठाव केल्याचे वि दा सावरकर 1857 चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथात नमूद करतात . या 1857 च्या क्रांतिमध्ये समस्त देश एकवटला असतांना बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ कांदम्बदरीत ब्रिटीश लोक राज्यकर्ते असतांना देखील हिंदू -मुस्लिम -बौद्ध असा संघर्ष का उभा केला गेला ? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे यावर राष्ट्रीय चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच आनंमठात ब्रिटीश साम्राज्याचा गुणगौरव व उदात्तीकरण केल्याचे आढळते,त्यामुळे त्यातून भारतीय स्वांतत्र्य लढ्यास कशी प्रेरणा मिळाली असेल ? हा संशोधनाचा ठरू शकतो.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत “सार्वभौम , समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य ” घडविन्याचा….. विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वांतत्र्याची हमी दिलेली आहे.
राज्यघटनेच्या 25(1) धर्म स्वांतत्र्याचा मूलभूत अधिकार दिला असून व्यक्ति धर्म आचरण्याचा मुक्त अधिकार दिला आहे. या अन्वये भारतातील प्रत्येक नागरिकास धर्म उपासना करण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. भारतीय राज्यघटनेने देश हा धर्मनिरपेक्ष असल्याची आणि धार्मिक उपासनेच्या स्वांतत्र्याची हमी दिली असतांना लोकशाही व्यवस्थेने या मानवी मुल्यांचा आदर करणे आगत्याचे आहे.
संविधान सभेत अनेक सदस्यानी एक जिन्नसी व धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून देशाचा गौरव केला आहे. मुळात धर्मनिरपेक्षता हे भारतीय लोकशाहीचे 1950 पासुनच वैशिष्ट्य ठरलेले असून ते राज्यघटनेचे अंतर्निहित तत्व आहे. आनंदमठ कांदम्बरीतील एकूण मांडणी धर्मनिरपेक्षतेची चौकट मोडणारी असून ती धर्मद्वेषाच्या पायावर आधारलेली दिसते . विशेषता: मुस्लिम द्वेष निर्माण करणे आणि त्यांचे अस्तित्व देशात नाकारणे , ‘वंदे मातरम ‘ घोषणेसाठी हिंसेचे समर्थन करणे हे कांदम्बरीतील वैशिष्ट्ये दिसतात .
त्यामुळे वंदे मातरम हे गीत धर्मनिरपेक्ष राष्ट्रात राष्ट्रगीतास साजेसे आहे काय ? हे तपासणेही गरजेचे ठरले आहे . सदर मूळ गीत हे तत्कालीन बंगाल प्रांताची सात कोटी जनसंख्या लक्षात घेऊन लिहिले गेले होते, जे त्यातील एका छंदावरुन दिसते .
” सप्तकोटी- कण्ठ-कलकल- निनाद-कराले
द्विसप्तकोटी भुजै धृत-खरकरवाले
के बले मा तुमि अबले!”
सप्तकोटी कण्ठ आणि द्विसप्तकोटी भुजै अर्थात सात कोटी कंठ आणि चौदा कोटी भुजा म्हणजे सात कोटी लोकसंख्या सदर गीतात अभिप्रेत आहे, जी ब्रिटीशाच्या अधीन असलेल्या तत्कालीन बंगाल प्रांताची लोकसंख्या होती आणि तत्कालीन भारताची लोकसंख्या चौपन्न कोटीपेक्षा जास्त होती, त्यामुळे तत्कालीन भारताची लोकसंख्या विचारात घेतली तर वंदे मातरम हे गीत जे सात कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते , ते भारताच्या राष्ट्रगीताच्या दर्जास न्याय देण्यास कसे सिद्ध होऊ शकेल ?
नवबौद्ध जनतेस बावीस प्रतिज्ञाचे पालन करीत असतांना वंदे मातरम गीतातील देवदेवतांच्या उदात्तीकरणाच्या मान्यतेस बौद्ध नागरिकांना भाग पाडणे हे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्वांची पायमल्ली करणारे ठरते की काय ? याची तपासणी राज्यकर्त्यानी करणे ही काळाची गरज आहे असे वाटते.
सतीश केदारे,
बौद्ध उपासक, मनमाड़
9604412387
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


