महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

जो मानव तथागत बुद्धांची शिकवण घेऊन आचरण करेल, त्यालाच बुद्ध कळतील : राजश्रीताई कदम

किलज येथे भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेचे उद्घाटन; समता सैनिक दलाचे प्रशिक्षण संपन्न

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

माणसाला माणूस म्हणून जगण्याची आणि समानतेची संधी मिळावी, यासाठी तथागत गौतम बुद्धांनी मानव कल्याणाचा मार्ग सांगितला. क्रोधावर नियंत्रण ठेवणे, राग व संतापा पासून दूर राहणे, सदैव चांगला विचार करणे, प्रत्येकाशी आदराने बोलणे, सदाचाराचा मार्ग स्वीकारणे आणि प्रेमाने जगायला शिकणे, यातूनच मानवाचे जीवन समृद्ध होते. बुद्धांची शिकवण केवळ ऐकून उपयोग नाही, तर ती आचरणात आणणाऱ्या मानवाला खऱ्या अर्थाने बुद्ध आणि त्यांचा धम्म समजतो, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई कदम यांनी केले.
मौजे किलज, ता. तुळजापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखेचे उद्घाटन तसेच समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी राजश्रीताई कदम बोलत होत्या.
यावेळी समता सैनिक दलाचे मेजर मल्हारी लोंढे यांनी उपस्थित महिला व पुरुष सैनिकांना एक दिवसीय प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सुमारे ५० महिला व पुरुष प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी केले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सरचिटणीस विजयकुमार बनसोडे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष शरद बागडे, जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड, बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे, डिव्हिजन ऑफिसर वैभव सिरसट, तालुका उपाध्यक्ष संरक्षण कांचन चिमणे, तालुका संघटक कैलास गायकवाड,गणेश बनसोडे , मनोज बनसोडे आधी जन उपस्थित होते
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या किलज ग्राम शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली ग्राम शाखा अध्यक्षपदी विलास विठ्ठल ढाले तर सरचिटणीस पदी विजयकुमार सिद्धगणेश [ गुरुजी ] कोषाध्यक्ष पदी प्रभाकर कांबळे संरक्षण उपाध्यक्षपदी देविदास गायकवाड संरक्षण सचिव पदी सुभाष गवळी संस्कार उपाध्यक्षपदी मिलिंदकुमार मस्के संस्कार सचिवपदी मनोजकुमार गायकवाड महिला उपाध्यक्षपदी जयश्री गायकवाड सचिव पदी सुकुमार गायकवाड पर्यटन उपाध्यक्षपदी भरत गवळी सचिव पदी ज्ञानदेव कांबळे आदींची ही निवड करण्यात आली
या सर्वांचे जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम सह जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा स्वागत पर सत्कार केला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद गायकवाड , दयानंद गायकवाड, आबा श्याम गवळी अमोल कांबळे , लकुल नेवाळे नामदेव इ गायकवाड , रामचंद्र गायकवाड , आदीसह अनेक बौद्ध उपासक व उपासकांनी परिश्रम घेतले
शेवटी आभार अध्यक्ष विलास ढाले यांनी मानले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या ग्रामशाखेचे उद्घाटन आणि समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणासाठी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!