डिस्टीलरी क्वार्टर मध्ये बाबासाहेब थांबले होते…!!!

नाशिक जिल्हा म्हणजे बाबासाहेबांची “कर्मभूमी”, ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रह, मुखेडचा सत्याग्रह आणि येवला मुक्कामी केलेली धर्मांतराची घोषणा. 14 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली त्याच्या पूर्वतयारीसाठी बाबासाहेब नाशिक रोड येथे आले होते, असे तत्कालीन सहकारी, प्रत्यक्षदर्शिनी सांगितले आहे. 11 ऑक्टोबर 1935 नाशिकरोड येथील डिस्टरी कॉटर मध्ये बाबासाहेब थांबले होते. महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे की बाबासाहेब ज्या -ज्या ठिकाणी थांबले होते ती ठिकाणे स्मृतिस्थळे म्हणून विकसित करून त्याचे ‘संवर्धन व जतन’ करायचे. हाच धागा पकडून नाशिकरोड, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळे संवर्धन समितीची 2023 मध्ये स्थापना झाली. या समितीने दुर्लक्षित असे नाशिकरोड येथील डिस्टीलरी क्वार्टर च्या इतिहासाला उजाळा दिला. समितीने ताबडतोब विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी नाशिक यांच्याशी पत्रव्यवहार करून हया ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व शासकीय पातळीवर निदर्शनास आणून दिले. तेव्हापासून सदर समिती सातत्याने पालकमंत्री/ आमदार/ खासदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. हे क्वार्टर “बाबासाहेबांचे स्मृतिस्थळ” म्हणून घोषित करून तेथे ग्रंथालय, वाचनालय सुरू करावे अशी मागणी लावून धरली आहे. त्या संदर्भात समितीचे अध्यक्ष, समाजभूषण कैलास तेलोरे, प्रमोद बागुल, अविनाश गायकवाड, किरण लोखंडे, बाळासाहेब घायवटे, राजू बनसोडे, भास्कर साळवे,अंबादास गवारे यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी “बुद्धविहार नाशिक रोड” या ठिकाणी 31ऑगस्ट 2026 दुपारी 2 वा.बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात 11 ऑक्टोबर 2026 रोजी बाबासाहेबांच्या स्फूर्तींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


