संपादकीय

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला भारत देश साक्षर व्हावा लोक सुद्न्य व्हावेत त्यांच्या वरील अन्याय अत्याचार कमी व्हावेत म्हणून आयुष्य वेचले तोच विचार कदाचित घेऊन युनेस्कोने 7 नोव्हेंबर 1965 रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. तसेच या दिवशी साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी 8 सप्टेंबर 1966 रोजी प्रथमच जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले.

देशाच्या विकासासाठी अधिकाधिक नागरिकांनी साक्षर होणे आवश्यक आहे. साक्षरता प्रगती आणि विकासाचा घटक बनली आहे. ज्या व्यक्तिला लिहिता-वाचता येते ती साक्षर असते. ज्याला ‘अ,ब,क’ चे ज्ञान आहे, भाषेचे मोठेपणा आहे तसेच योग्य आणि अयोग्य मधील फरक समजतो तो साक्षर आहे.

साक्षरतेच्या विकासाबरोबरच समाजात आदरही निर्माण होतो. लोकांना साक्षरतेचे महत्त्व आणि फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो.

साक्षरता दिवस हा जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा दिवस आहे, जो दरवर्षी सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. या निमित्ताने समाजात शिक्षणाचा प्रसार होतो. भारतातील साक्षरतेची पातळी वाढवण्यासाठी हा दिवस विशेष मोहीम म्हणून साजरा केला जातो.

भारत सरकार (Government) साक्षरतेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान राबवते, ज्याद्वारे सर्व भारतीयांना शिक्षणाकडे आकर्शित करते.

६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन (२०१० पर्यंत ) ‘शिक्षणाचे सर्वत्रीकरण करणे ‘सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे शालेय व्यवस्थापनात समाजाचा सहभाग घेऊन ‘ शिक्षणातील सामाजिक,प्रादेशिक व लैंगिक भेद दूर करणे ‘ हेही सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे . २००९ मधील शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्ये आणखी वाढवली ती म्हणजे ‘ प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे ‘ कायद्याच्या अंलबजावणीच्या पर्यवेक्षणासाठी सुविधा उभारणे ‘ कायद्याच्या प्रसारासाठी राष्ट्रीय प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करणे इ .शिक्षकांच्या अध्यापन व निरंतर शिक्षणासाठी १९९५ मध्ये शिक्षक अध्यापन राष्ट्रीय परिषद स्थापना झाली .सर्व शिक्षा अभियानातील शिक्षक प्रशिक्षणासाठी ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावत आहे ,

सर्व शिक्षा अभियानाची वैशिष्टये

१) वैश्विक प्राथमिक शिक्षणासाठीची विशिष्ट चौकट

२) दर्जेदार शिक्षणाच्या मागणीला दिलेला प्रतिसाद

३) मूलभूत शिक्षणात सामाजिक न्यायास प्रोत्साहन देण्याची संधी

४) पंचायतराज संस्था ,समाज आणि संघटनांचा सहभाग घेऊन विकेंद्रीकरणास प्रोत्साहन देणारी योजना

५) वैश्विक प्राथमिक शिक्षणासाठीच्या राजकीय इच्छाशक्तीचे प्रकटीकरण

६ )केंद्र ,राज्य व स्थानिक प्रशासनातील दुवा

७) राज्यांना त्यांच्या शिक्षणविषयक कल्पनांना वाव देणारे व्यासपीठ

८) शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचे साधन

सर्व शिक्षा अभियानात खालील गोष्टी राबविल्या जातात.

१) शाळा उपलब्ध नसलेल्या अधिवासांमध्ये शाळा उभारणे .

२) शाळांमध्ये पायाभूत सुविधा करणे , जसे वर्गखोल्या उभारणे ,पिण्याच्या पाण्याच्या व स्वचतेच्या सुविधा उभारणे , देखरेख व सुधारणेसाठी

आर्थिक मदत पुरविणे

३) अतिरिक्त शिक्षक पुरविणे , शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतेत वाढ करणे .

४) शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे ,पाठयपुस्तके , गणवेश पुरविणे

५) जीवनकौशल्ये विकसित होतील असे प्राथमिक शिक्षण देणे

६) मुलींच्या शिक्षणावर तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणावर विशेष लक्ष्य पुरविणे . समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांना सर्वसामान्य समवयस्क मुलांसोबत शिक्षण दिले जाते. [१]

७) संगणकाचे प्रशिक्षण देणे

वरील उध्दीष्टे साध्या केल्यास आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचे सार्थक होईल

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!