स्त्रियांचे बलात्कार करणारे अध्यात्मिक बुवा

समाज माध्यम से साभार
मागे आश्रम नावाची एक सिरीज आलेली ज्यात ह्या भोंदूंच्या आश्रमांमध्ये कसं आर्थिक आणि लैंगिक शोषण चालतं हे दाखवलं होतं. हिंदुविरोधी म्हणून त्याला खूप विरोध करण्यात आला आणि सेटवर तोडफोडही झाली
अशाच एका प्रथेवर आधारित महाराज हा सिनेमा आला त्यावरही टीका झाली. ती प्रथा अस्तित्वात होती. जमल्यास जरूर बघा
जेव्हापासून बुवाबाजी सुरु आहे तेंव्हापासून हे बाबा बाबी बाबे भक्तीच्या नावावर शोषण करत आले आहेत आणि कित्येकांचे आश्रम हे गुन्ह्यांचे अड्डे असतात
आसारामवर नोंदवलेले गुन्हे अशा प्रकारचे आहेत
जोधपूर बलात्कार खटला २०१३ आसारामने १६ वर्षीय मुलीचा स्वतःच्याच जोधपूर आश्रमात करणी उतरवण्याच्या नावाखाली बलात्कार केला
२०१८ मध्ये POCSO कायद्याअंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा झाली
हा निकाल आल्यानंतर दोन बहिणींनी पुढे येऊन सांगितलं की आसारामच्या गुजरातमधील मोटेरा आश्रमात आसाराम आणि त्याच्या मुलाने १९९७ ते २००६ दरम्यान दोन्ही बहिणींवर बलात्कार केले आहेत. आश्रमातल्या इतर पाच जणांवरही ह्या गुन्ह्यात सामिल असल्याचे आरोप होते. ह्या खटल्यातही आसाराम आणि त्याच्या मुलाला दोषी ठरवलं
ह्या गुन्ह्यांच्या तपासाच्या आणि सुनावणीच्या दरम्यान पीडित कुटुंबे, संबंधित साक्षीदार ह्यांना तऱ्हेतऱ्हेने धमकावण्याचे आणि केसेस मागे घेण्यासाठी दडपण आणण्याचे प्रयत्न केले गेले. आसारामच्या डॉक्टरांवर कोर्टात त्यांची साक्ष होती त्या दिवशी हल्ला करण्यात आला आणि २०१५ नंतर ते बेपत्ता झाले. दुसऱ्या साक्षीदाराचाही खून करण्यात आला
२००८मध्ये आसारामच्या गुजरात आश्रमातून बेपत्ता झालेल्या मुलांचे मृतदेह जेंव्हा मिळाले तेंव्हा अतिशय निर्घृण अत्याचार झाल्याच्या खुणा त्यावर होत्या. ह्यात आसारामच्या आश्रम प्रशासनाला फक्त हलगर्जीपणासाठी दोष देण्यात आला
असा हा बलात्कारी खुनी पाखंडी आसाराम. ह्याला आज आजारपणाच्या कारणाने जामीन मिळाला. काही दिवसांपूर्वी निधन झालेले प्राध्यापक साईबाबा हे ९०% अपंग असून व्हीलचेअरवर होते. अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते. त्यांना तुरुंगात व्हीलचेअरसुद्धा नाकारली गेली आणि दोन सहकैद्यांना त्यांना नैसर्गिक विधींसाठीही घेऊन जावे लागायचे. स्टॅन स्वामी पार्किन्सन्स रुग्ण असून त्यांना पाणी पिण्यासाठी सिपरसुद्धा नाकारला गेला
रामरहीम ह्या पाखंडी बलात्काऱ्याची कहाणीही आसारामसारखीच शोषण आणि हत्यांनी भरलेली आहे. ज्यांच्याकडे लोक लाखोंच्या ढिगाने मेंदू गहाण टाकून रांगेत उभे राहिलेले असतात अशा सर्वांना प्रभावित करण्यासाठी राजनेते कुठल्याही ठरला जातात हे आता सामान्य झालंच आहे. पण नवल त्या सर्व लोकांचं वाटतं जे सगळी वस्तुस्थिती माहित असूनही ह्या बलात्काऱ्यांसाठी मोर्चे काढतात. हे पाखंडी करावासातून बाहेर येण्याची वाटच बघत असतात आणि कधी एकदा त्यांच्या पायावर टाळकं टेकवू असं झालेलं असतं
देव, धर्म आणि अध्यात्माच्या नादात आपलं भलं होणं सोडाच पण निर्घृण खुनी विकृत बलात्काऱ्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतोय हे ही नं कळण्याइतकं आपलं पतन झालं??
हे लोक स्वतःच्याच आश्रयाला आलेल्या भक्तांना लुबाडून आपली संपत्ती उभारून वर आश्रमातल्याच मुलींवर बलात्कार करून हत्या करायला धजावतात ह्यात नवल नाही कारण हे लोक हेच करायला बाबा बनलेले आहेत. पण कीव त्या लोकांची करावी वाटते जे सावज बनण्यासाठी स्वतःच पैशांची पाकिटं आणि कुटुंबातल्या मुलीबाळी घेऊन ह्या नराधमांच्या पुढे रांग लावून उभे आहेत
👿9326365396👿
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत