पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरंजामशाहीने डोके वर काढले..?

काल परवा महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. काही वर्षे आधी एकमेकांवर तुटून पडणारे… एकमेकांचे राजीनामे मागणारे..
चेहरे आता मंत्रीमंडळात दिसत आहेत.यालाच म्हणतात लोकशाहीचा गळा घोटून सरंजामशाही अस्तित्वात आणणे.
सरंजामशाही म्हणजे तरी काय…?
तर सामान्य मूर्ख लोकांना गुलाम समजून वागणूक देणे. स्वतःला प्रमुख समजणाऱ्या टग्यांनी श्रेष्ठ व विलासी जीवन जगणे.
ज्यांचा राजे व महाराजांच्या घरात जन्म झाला त्यांनाच मंत्री करण्याचा सपाटा सर्व पक्षीयांनी लावला आहे.जे लोक शेतकरी व शेतमजूर वर्गातून जन्माले आले त्यांना डावलण्याचे काम सर्रासपणे चालू आहे.
शेतकऱ्यांची व सर्वसामान्याची बाजू लावून धरणाऱ्या लोकांना राजकीय फास टाकून फसविल्याचे कोणाच्या लक्षात सुध्दा आले नाही. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना वेगळे करून शेतकरी संघटना कमकुवत करण्यात आली. गोरगरीबांचे कैवारी, अपंगांचे नाथ..
बच्चू कडूचा राजकीय काटा सर्वच सरंजामशाहीने मिळून काढला.
आता तर ओबीसी लढाई लढणारे छगन भुजबळ व प्रस्थापितांना शिंगावर घेणारे गोपिचंद पडळकर यांना मंत्रिमंडळातून डावलून आम्ही सरंजामशाहांच राजा म्हणून राहणार ही मानसिकता दाखवून दिली.
निवडणुकी आधीच वंचित बहुजन आघाडीला डावलून शोषित, पीडित, कष्टकरी,कामगार वर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
परंतु सरंजामशाहीची माज आलेल्या लोकांनी लक्षात ठेवावे.. पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो.या आविर्भावात राहू नका.ज्या सर्वसामान्यांनी तुम्हाला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले…
तेच सर्वसामान्य लोक तुम्हाला खोल गाडायला सुध्दा कमी करणार नाहीत.
मंत्री मंडळाच्या विस्तारात असे अनेक मंत्री आहेत की ज्यांच्या अनेक पिढ्यांनी कारखानदारी, शिक्षण संस्था व उद्योगधंदे, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे राजकीय व आर्थिक दहन व दमन करण्याचा प्रयत्न केला आहे.तो आज ही २१ व्या शतकात चालू आहे.लोक काही दिवस तुमचे चाळे पाहतील.परंतू तुमचेच फास व तुमचेच जाळे… घेऊन प्रस्थापित लोकांना हेच विस्थापित लोक अडकवून ठेवतील…. तेव्हा बोंबाबोंब करू नका.
शेतकरी,शोषित,पीडित,कामगार व कष्टकरी, वंचित बहुजन यांच्या आघाड्या व त्यांच्यातील एक एक मोहरे बाजूला करून अनेक संघटना कमकुवत करून ..
पुन्हा एकदा आम्ही सरंजामशाहाच महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो.
हे सरंजामशाहीने दाखवून तरी दिले नसले ना…?
मिलिंद वानखडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत