मुंबईच्या 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसुली सुरूच राहणार 2026 पर्यंत.

मुंबईतील 31 फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या 5 प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या 2242.35 कोटी रुपयांना एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली एमएसआरडीसीने दिली आहे. वर्ष 2026 पर्यंत मुंबई टोलमुक्त होऊ शकते कारण तोपर्यंत मुंबईतील 5 एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार आहे. अनिल गलगली यांच्या मते यापैकी काही फ्लाईओवर वर्ष 2000 च्या पूर्वीचे असून बांधकाम खर्च सरकारी तिजोरीतून झाला असताना टोल वसूली का केली जात आहे आणि एमईपी सारख्या खाजगी कंपनीस टोल मार्फत नफा कमविण्यास प्रोत्साहन दिले जाते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण आता पूर्व आणि पश्चिम या दोन्ही द्रुतगती मार्गाची देखभाल महापालिका करत आहे. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ऑडिट करून 2026 नंतर मुंबई टोलमुक्त करण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत