नवनीत राणा यांचे डिपॅाजीट जप्त करत 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करु – बच्चु कडू यांचा निर्धार

अमरावतीमध्ये उमेदवार दिल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नवनीत राणांवर हल्ला चढवला आहे. तसेच राणांना उमेदवारी देणाऱ्या भाजपवरही त्यांनी हल्ला चढवला आहे.
जनतेला तानाशाही मान्य नाही, आणि लोकांच्या भावनांना विचारात न घेऊन भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघात राणांना उमेदवारी देऊन तानाशाही केली आहे असे ते म्हणाले.
लोकांना आमचा सर्वसमावेशक लोकहिताचा विचार पटतो. सध्या मतदार संघात प्रहारचे दिनेश भाऊ खासदार झाले पाहिजे ही लोकभावना आहे. त्यामुळे जनमताचा आदर करत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि भरघोस मताधिक्याने ते निवडून येतील आणि अमरावतीचे चित्र पालटले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत