
विशाखापट्टणम. 23/11/23
आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. यात पाच सामने खेळले जातील. या मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. ऋतूराज गायकवाड पहिल्या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार असेल.
श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात दाखल होणार आहे. इशान किशन, यशस्वी जैस्वाल,रिंकू सिंग,रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांचाही या मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत