महाराष्ट्रमुख्यपान
“तुमभी खाओ और हमेभी खिलाओ!”

"ना खाऊंगा ना खाने दूंगा!"असे मोदी भाषणात म्हणत.आम्हाला खूप आनंद झाला.सापडला ! एक इमानदार माणूस सापडला.राजकारणात इमानदार माणूस सापडत नाहीत.कारण राजकारण हे सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी नासले,बिघडले.आम्हाला एक सज्जन माणूस प्रधानमंत्री मिळाला.नरेंद्र मोदी.म्हणून भारतीय लोकांनी कांग्रेस चा स्वातंत्र्य लढा, नेहरुंनी उभे केले इन्फ्रास्ट्रक्चर असे सर्व विसरून मोदींना पसंती दिली.भरगोस मतांनी निवडून दिले.
कांग्रेस चे अफाट कार्य का विसरलो?का बाजूला फेकले?कारण कांग्रेस चे वारसदार भ्रष्टाचारात लिप्त झाले होते.अतिरेक केला होता. कोणी कोणाकडे तक्रार करायची,कोणी ऐकून घ्यायचे,ही आशा मावळली होती.ते अजूनही सुधारले नाहीत.शक्यता नाहीच.म्हणून मोदींचे किंवा भाजपचे काहीही कर्तव्य नसतांना लोकांनी भाजपला मतदान केले.मोदींना प्रधानमंत्री बनवले.फक्त एकच!मोदी इमानदार आहेत.पैसे खात नाहीत.कोणाला खाऊ देत नाहीत.चोरांना जवळ ठेवत नाहीत.
पण हे सर्व खोटे ठरले आहे.कोणी ठरवले? आम्ही नाही.मोदीनींच खोटे ठरवले.कोणाला माहीत नाही कि, महाराष्ट्रातील सराईत चोरांना मोदींनी जवळ केले.खांद्यावर घेतले.कडेवर घेतले. मंत्री बनवले.ते सुद्धा फडणवीस यांना बाजूला सारून.जे भाजप साठी राब राब राबले त्यांना डावलून.हे भयानक वास्तव आहे.कितीही युक्तिवाद केला तरी फडणवीस,मुणगुंटीवार,सांबीत पात्रा,शेलार असा कोणताही तिसमारखा याचे निरसन करू शकणार नाही.
" राष्ट्रवादीका आधा मंत्रीमंडल जेलमे जायेगा." "पवार फैमीलीकी सत्तर हजार करोडकी फाईल अबतक बंद नही हुई." असे म्हणणारे मोदी फक्त चार दिवसांत शिंदे,भुसे, गुलाबराव,अजितदादा,भुजबळ, मुश्रीफ,मलिक यांना कडेवर घेऊन फिरत आहेत.कालच अजितदादांनी मोदींना गुच्छ देऊन सत्कार केला .आणि त्याचे शिष्यत्व स्वीकारले.मोदी अत्यंत आनंदीत, उल्हासित दिसले.असा आनंद आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिला नाही.त्यांचा हसतमुख चेहरा सांगत होता.
“तुमभी खाओ और हमेभी खिलाओ!”
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत