ब्राह्मणवाद्यांनी तिला विद्येची देवता मान्य करण्याचे नाकारले.

प्रा.गंगाधर नाखले
मातोश्री सावित्रीबाई फुले ही जातीने माळी असल्यामुळे ती शूद्र होती. म्हणून ब्राह्मणवाद्यांनी तिला विद्येची देवता मान्य करण्याचे नाकारले. ब्रम्हा ने आपल्या स्वतःच्या मुलीला गर्भवती करून मनूला जन्म दिला त्या सरस्वतीला विद्येची देवता घोषित केले. तरी माळी समाज गप्प का ?
आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो खऱ्या अर्थाने या देशातील बहुजन ओबीसी एसटी एससी यांचा धर्म नसून मुळातच तो ब्राह्मणांचा धर्म आहे.
जर हिंदू धर्म हा या देशातील तेली , माळी कुणबी, मांग ,महार, चांभार, सुतार, लोहार इत्यादी जातींचा सन्मानाने उल्लेख केला असता. परंतु कुठल्याच धर्मग्रंथांमध्ये या जातींचा सन्मानपूर्वक उल्लेख नाही उलट यांना शिवीगाळ केली आहे. ब्राह्मणांचा मात्र प्रत्येक ठिकाणी सन्मानपूर्वक उल्लेख केलेला आहे.
वाल्मीकि रामायण ज्यांनी लिहिले ते वाल्मिकी ब्राह्मण. रामचरितमानस यांनी लिहिले ते तुलसीदास ब्राह्मण. महाभारत, अठरा पुराण (खरे एकूण पुराण 108 आहेत) ज्यांनी लिहिले ते वेद व्यास ब्राह्मण. गीता लिहिणारा ब्राह्मण. मग सर्व धर्मग्रंथ जर ब्राह्मणांनीच लिहिले आणि त्यांना सर्व अधिकार या ग्रंथांमध्ये आहे तर मग हे सर्व ग्रंथ बहुजन हिंदू धर्माचे कसे होऊ शकतात.
रामचरितमानस मध्ये तुलसीदास स्पष्ट म्हणतात शूद्र(ओबीसी, एसटी ,एससी) कितीही ज्ञानी असला तरी तो पूजनीय नाही. ब्राह्मण कितीही नीच असला तरी तो पूजनीय आहे. ज्या ग्रंथामध्ये हिंदूंना नीच म्हटल्या जाते तो ग्रंथ बहुजन हिंदू बांधवांचा कसा होऊ शकतो?
सरस्वती ही खऱ्या अर्थाने ब्रह्माची मुलगी. ब्रम्हाने आपल्या मुलीलाच गर्भवती केले आणि मनूला जन्म दिला. त्यानंतरही ब्रह्मदेवाने तिला पुन्हा सात वेळा गर्भवती केले. रति, मन, बुद्धी, महान, दिक, आणि संभ्रम ही सरस्वतीची मुले होय.(संदर्भ: मस्तपुराण, अध्याय 4, पृष्ठ क्रमांक 25, प्रकाशन: गीता प्रेस गोरखपुर) अशा विचित्र पद्धतीने संतान उत्पन्न करणारी सरस्वती ला ब्राह्मण विद्येची देवता करू शकतात परंतु ते कधीही सावित्रीबाई फुले ला विद्येची देवता म्हणणार नाही, कारण ती शूद्र आहे.
सरस्वतीने कुठेही महिलांना शिक्षित केल्याचा पुरावा नाही. कुठेही गुरुकुल उघडून तेथे महिलांना शिकविले नाही. कुठेही सरस्वतीने महिलांना शिकता यावे यासाठी विद्यापीठाची स्थापना केली नाही. मग विद्येची देवता सरस्वती कशी ?
याउलट सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. ज्या ब्राह्मणवादांनी महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. त्यांच्यावर कठोर अत्याचार केले अशा महिलांना शिक्षणाची सोय सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. इतके महान कार्य सावित्रीबाई फुले चे असताना ब्राह्मणवादी लोक तिला विद्येची देवता मानत नाही. आजपर्यंत ही महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न मिळालेला नाही.
माळी समाजाचे लोक ब्राह्मणवाद्यांना हा प्रश्न का विचारत नाही की सरस्वतीने आमच्यासाठी काय केले? ती विद्येची देवता कशी होऊ शकते ? सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचे काम केले तरी ते विद्येची देवता का नाही ? परंतु ब्राह्मणवादाने या देशातील ओबीसी एसटी एससी यांना धर्माची अफू चारली आहे त्यामुळे ते ब्राह्मणवादी धर्मग्रंथांना पूजनीय मानतात आणि आपल्या पूजनीय पूर्वजांना धिक्कारतात.
प्रा.गंगाधर नाखले
दि. 12.2.2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत