उपोषण सोडताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्यनराजे व संभाजी राजे पाहिजेत- जरांगे पाटील

उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे. सरकारने आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 16 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार हे मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत. चंद्रकांत पाटील देखिल जालन्याला जाणार आहेत.
संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. त्यामुळे आता मनोज जरांगे यांचं उपोषण सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत