आर्थिकमुख्यपान

विमान प्रवासाच्या तिकिट दरात ९०टक्के वाढ

प्रवासात खर्च होणारा वेळ वाचवत तो वेळ भटकंतीसाठी देण्याच्या हेतूनं अनेकजण रेल्वे किंवा रस्तेमार्गानं प्रवास करण्याऐवजी विमान प्रवासाला प्राधान्य देतात. पण, आता मात्र विमान प्रवासाचे दर पाहता हा खर्च बऱ्याचजणांना परवडणारा नाही हेच आता स्पष्ट होकत आहेत. मागील काही काळापासून गो फर्स्टची काही विमानं सेवेतून बाद करण्यात आली आहेत. तर, स्पाईस जेटही त्याच यादीत येत आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि इतर कंपन्यांनी घेतलेली नवी विमानं इतक्या कमी कालावधीत सेवेत रुजू होणार नसल्यामुळं त्याचे थेट परिणाम तिकीटांच्या दरांवर होताना दिसत आहेत.

विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बहुतांश लहान शहरांमध्येही विमानतळं सुरु झाल्यामुळं शहरी धकाधकीपासून दूर असणाऱ्या ठिकाणी जाण्यालाच अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. ज्यामुळं विमानानं प्रवास करणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील प्रमुख शहरांतून बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, जयपूर, श्रीनगर, कोलकाता आणि गोवा या शहरांमध्ये विमान प्रवासातून ये- जा करणाऱ्यांची संख्या मोठी असून, 10 ते 16 नोव्हेंबरदरम्यान या ठिकाणांवरील विमान प्रवासाचे दर वाढले असल्याचं लक्षात येत आहे.

नोव्हेंबर 10 ते 15 दरम्यानचे तिकीट दर (परतीच्या प्रवासासह) 

मुंबई – दिल्ली – 18944 रुपये 
मुंबई – बंगळुरू – 106888 रुपये 
मुंबई – गोवा – 11479 रुपये 
मुंबई- कोलकाता – 25339 रुपये 
मुंबई- श्रीनगर – 35227 रुपये 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!