अखेर भावनिक आंबेकडरी जनतेची फसवणूक थांबवण्यात यश आले

- शांताराम ओंकार निकम
उल्हासनगर ४ येथील सुभाष टेकडी मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी शासनाकडून मिळवलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बदलून पूर्णकृती पुतळा बनवण्यात येत आहे.
या पुतळ्याच्या कामास सुरुवात फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये झाली.१४ एप्रिल २०२४ मध्ये उदघाटन होणार होते, पण लोकसभा निवडणूक असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले नाही.आचारसंहितेमध्ये राजकीय लोकांना उदघाटन करता येणार नाही हा त्यातला कळीचा मुद्दा होता.
आता पूर्णकृती पुतळ्याचे उदघाटन हे विजयादशमी दिनी करण्याचे आयोजन दिसते आहे. त्यामुळे कामामध्ये दिरंगाई होत असावी, असे वाटण्यास जागा आहे.
सदर पुतळा हा एक कोटी खर्चून महाराष्ट्र शासनाच्या निधीतून होत आहे.मा.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळेच हे श्यक्य होत आहे.
इतर कोणी मुख्यमंत्री असते तर या पूर्णकृती पुतळ्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले असते.याचे सगळे श्रेय मा.मुख्यमंत्री यांना द्यायला हरकत नसावी.कारण त्यांच्याच कार्यकाळात उल्हासनगरमध्ये शेकडो कोटींची नागरी विकासाची कामे झाली अनेक रस्ते बनवले गेले.अपवाद माझी मागणी असलेला रस्ता’तक्षशिला विद्यालय प्रवेशद्वार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व्हाया गुरुनानक शाळा-सेंट्रल पार्क-ब्लॉक ए २९० .या रस्त्याला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा रस्ता बनवण्यास घेऊ असे आश्वासन मिळाले आहे,बघू .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एक कोटींचा पुतळा उभारण्यास का दिरंगाई होतेय याची कारणे शोधली पाहिजेत.
ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार ठेकेदाराकडून पैशांची मागणी केली जात आहे.त्यामुळे ठेकेदार कामाच्या ठिकाणी लवकर येत नाही.
ही मागणी म्हणजे कमिशन कोण मागते आहे.याचा शोध नागरिकांनी घेतला पाहिजे.
पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.अशी ओरड नागरिकांनी सुरू केली आहे.
महापालिकेच्या कामांमध्ये अधिकारी कर्मचारी, नगरसेवक, भाई लोक यांना ४०टक्के कमिशन द्यावे लागते असे एकदा उपमहापौर म्हणाल्या होत्या.
जर ठेकेदार ४०% कमिशन वाटत असतील तर स्वतःसाठी कमीत कमी २०% तरी ठेवत असतील, म्हणजेच काम फक्त ४०% टक्के होत असेल.मग अशावेळी चांगल्या कामाची अपेक्षा कशी करायची?
काम ते काम असते,मग ते पुतळ्याचे असो की रस्त्या-नालीचे असो.कमिशन तर द्यावेच लागते ना?
आपल्यासाठी तो भावनिक मुद्दा असला तरी ठेकेदारासाठी तो भावनिक मुद्दा नसेलच ना,त्यातही तो कमाईचे साधनच बघणार नाही का?
या पुतळ्यासाठी जरी शासनाने निधी दिला असला तरी त्याचे पर्यवेक्षण उल्हासनगर महापालिकाच करत आहे .त्यामुळे तिथल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून कमिशन विरहित कामाची आपण अपेक्षा धरू शकतो का?
नगरसेवक आता माजी झाले असले तरी पण माजी नगरसेवक सरळ कमिशन न मागता जयंतीच्या नावाने,कार्यक्रमाच्या नावाने पावत्या घेऊन गेले असण्याची शक्यता नाकारून चालणार नाही.
ज्यावेळी पुतळ्याच्या कठड्याला तीन सिरॅमिकच्या टाईल्स लागल्या होत्या तेंव्हा माझा सरकारी विनायक शिंदे याने मला माहिती दिली,त्याचे म्हणणे होते,’ आपण घराला ,संडासला ज्या टाईल्स लावतो त्या लावण्याचे काम सुरू आहे.तू काही तरी कर.कसे दिसते ते? एक कोटींचा पुतळा आणि सिरॅमिकच्या टाईल्स हे बरोबर नाही.’
मी तातडीने पर्यवेक्षण करणारा अभियंता श्री सेवकांनी यांच्या कानावर ही गोष्ट घातली,त्यांना सांगितले,’ पुतलेका एक कोटी का काम सुभाष टेकडी चौक मे शुरु है.पुतलेके फौंडेशनको ग्रॅनाईट टाईल्स लगाने के बजाय सिरॅमिक टाईल्स लगायी जा रही है ,यह गलत बात है,
आप काम अभीही रुकवावो,बाद मे सब तोडना होगा, बिचारे ठेकेदार का नुकसान होगा’असे सांगितले .’
त्यावर
‘ऐसा हो ही नही सकता, मै देखता हु और ग्रॅनाइटही लगाने को बोलता हु.’ असे त्यांनी मला सांगितले.माझे समाधान झाले नाही म्हणून मी उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर यांच्या कानावरही ही गोष्ट घातली, त्यांनीही ,’बघतो, आणि काम थांबवतो’ असे आश्वासन दिले.दोन दिवसानंतरही त्याच टाईल्स लावण्याचे काम सुरूच असल्याचे विनायक शिंदे यानें सांगितले.
त्यानंतर शहानिशा करण्यासाठी मी कामाच्या ठिकाणी गेलो.आणि खरोखर त्या सोळाशे ते दोन हजार रुपयांना चार बाय आठच्या मिळणाऱ्या सिरॅमिकच्या लाद्या लावण्याचे काम सुरू होते.मला धक्काच बसला,एक कोटीच्या पुतळ्याच्या कामात इतक्या हलक्या दर्जाच्या टाईल्स लावणे हे खरे म्हणजे ठेकेदार, अभियंता,महापालिकेचे सर्व संबंधित कर्मचारी -अधिकारी,वास्तू विशारद, पुतळा समिती यांना शोभा तरी देते का? काहीतरी पटेल असेच नको का करायला?मांजर डोळे मिटून दूध पिते,तिला वाटते आपल्याला कोणी बघत नाही’ असेच नाही का?
तेथेच चौकात बाजूला उभे असलेले पुतळा समितीचे सदस्य देविदास खळे व इतर कार्यकर्ते उभे होते,त्यांना सदर बाब सांगितल्यावर त्यांनी सांगितले की,आम्ही ठेकेदारला प्रश्न विचारला होता, तेंव्हा ही टाईल्स खास बनवून घेतली आहे.असे त्याने आम्हाला सांगितले, ही टाईल्स मिठमोठ्या हॉटेलला लावलेली आहे.’
आपण काय हॉटेल बनवत आहोत का? असा मी प्रश्न करताच ,तेथे उभे असलेले वनदेव पळसपगार म्हणाले,ही टाईल्स स्पेशल आहे,ग्रॅनाईट आणि मार्बलची चमक जाऊ शकते,पण याची जाणार नाही,असे ठेकेदार यांनी सांगितले.’
काहीही असो इथे ग्रॅनाइटच बसेल, पुतळा समितीला सांगून हे काम थांबवयाला सांगा नाहीतर मी हे लोकसभा निवडणुकीनंतर तोडायला लावेल.त्याचं बिचाऱ्याचं नुकसान होईल,मी ही बाब संबंधित अभियंता,अतिरिक्त आयुक्त यांना देखील सांगितले आहे.’असे मी म्हणालो.
त्यावर ते सगळे म्हणाले,’झाले नुकसान तर झाले,ठेकेदार ऐकत नाही त्याला काय करणार.?’
त्यावर ते आणखी म्हणाले की, सकाळीच मा.खासदार श्रीकांत शिंदे, आणि त्यांचे सहकारी येऊन गेले.त्यांनी हे काम पाहिले,कोणीच काही बोलले।नाही.’
आणखी बरीच चर्चा झाली.
त्यानंतर तीन टाईल्सनंतरचे काम सुरूच राहिले,ते आणखी पुढे गेले.मागील बॅकग्राउंड सिरॅमिक टाईल्सने बनवण्यात आले.
मी अनेकांना ही बाब सांगितली ,त्यात पुतळा समितीचे अध्यक्ष अरुण पवार,रिपायीचे नाना पवार,शिवसेनेचे नाना बागुल,वास्तू विशारद सारंग थोरात,व्ही. बी. ससाणे,के.,एस. ससाणे,या सारख्या अनेक महत्त्वाच्या लोकांना सांगितले,पण काम सुरूच होते.
ठेकेदार ऐकत नव्हता आणि पुतळा समिती हतबल होती,
लोकसभेची निवडणूक झाली .
मी पुन्हा अभियंता सेवकांनी यांना वारंवार आठवण करून दिली.
माझे प्रयत्न सुरू असतानाच आणखी काही लोकही प्रयत्न करत होते.
शेवटी त्या टाईल्स काढण्याचे काम ठेकेदारांनी सुरू केले आहे.
जे काम पुतळा समितीने ,ज्यांनी हे काम पास केले त्या आमदार, खासदार यांनी करायला पाहिजे होते.सामान्य माणसाला करावे लागले,यातून सामान्य माणसातही ताकद असते,पण ती त्याला ओळखता येत नाही,हेच खरे.
आता त्याठिकाणी अतिशय सुंदर दिसणाऱ्या ,टिकाऊ ग्रॅनाईटच्या लाद्या लागतील.पुतळ्याची शान वाढेल.
फक्त त्या अगोदर लावल्या होत्या तशा काळ्या शेडच्या नसाव्यात,त्या पांढऱ्या शेडमध्ये असाव्यात,म्हणजे पुतळ्याची चमक वाढेल अशी जनतेची ईच्छा आहे.
शांताराम ओंकार निकम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत