भीमा कोरेगाव चा रणसंग्राम – प्रकाश समशेर

संदर्भ : चर्मकारांचे शत्रू कोण ?
पृष्ठ ; ३२ – ३३
लेखक : प्रकाश काशिनाथ समशेर
औरंगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले .
औरंगजेबाने संभाजीराजे प्रमाणे अजपर्येंत कोणालाही ठार केले नव्हते . राजेंना एका घावात ठार मारण्याऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी ? प्रथम संभाजी राजेंची जीभ कापण्यात आली . कारण संभाजी राजांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले होते . संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी
१) सातसतक
२)नायिकाभेद
३) नखशिकांत
४) बुधभूषण
हे चार ग्रंथ लिहिले होते. म्हणून प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राम्हण सल्लागारांनी औरंगजेबाला दिला. नंतर संभाजी राजेचे क्रमशः कान , डोळे व त्वचा काढण्यात आली . ही निर्दयी शिक्षा मनुस्मृती संहिस्ते प्रमाणे देण्यात आली . म्हणजेच औरंगजेबाच्या माध्यमातून संभाजी राजेंना ही शिक्षा ब्राम्हणांनीच दिली .
संभाजी राजे हे धर्मवीर नसून स्वातंत्रवीर होते .
औरंगजेबानी संभाजी राजेंना धर्मद्वेषाने ठार मारले नसून राजकीय संघर्षामुळे ठार मारले .औरंगजेबाने राजेंना फक्त दोनच प्रश्न विचारले १) तुमच्या खजिन्याचा चाव्या कुठं आहेत ? २) माझ्या सरदारांपैकी तुम्हाला कोण फितूर आहे? औरंगजेबाने राजेंना कधीच धर्मातराचा आग्रह कधीच धरला नव्हता. औरंगजेबाची मुलगी देण्याचाही विषय नव्हता . कारण औरंजेबाची मुलगी संभाजी राजे पेक्षा वयाने १६ वर्ष मोठी होती .
शेवटी ब्राम्हणाच्या सांगण्यानुसार संभाजी राजे चे देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले व हे तुकडे वड बुद्रुक ( पुणे ) येथील रानात फेकण्यात आले . गोविंद महाराने हे तुकडे एकत्र केले व गणपत चांभाराने ते शिवून शेवटी संभाजी राजेचे देहाचे अंत्यसंस्कार केले . छात्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे ची हत्त्या करून ब्राम्हणांनी समतावादी शिवशाही संपवली . आणि पेशवाही निर्माण झाली .
छत्रपती संभाजी राजेंच्या हत्त्ये नंतर मोगलाई स्थापनहोण्याचे ऐवजी पेशवाई का आली ?
मोगल व पेशव्यांत ( ब्राम्हण ) यांच्यात एक गुप्त समजोता ( करार ) झाला होता . तुम्ही आम्हाला संभाजी राजेंना पकडून द्यावे बदल्यात तुम्हाला हे राज्य सोपवू असा हा करार होता . पेशवाईत मानवतेची क्रूर विटंबना
पेशवाईत ब्राम्हणाच्या हाती पूर्ण सत्ता आली. शूद्र ( OBC ) व अस्पृश्यावर अनेक बंधने घातली गेलीत. नवीन कपडे , भांडी वापरू नयेत . शस्त्रबंदी , शिक्षणबंदी व धनसंचयबंदी घातली गेली . अस्पृश्याना सार्वजनिक विहिरी , तलावावर पाणी पिऊ नये पाणी भरू नये .थुंकी रस्त्यावर पडू नये म्हणून गळ्यात गाडगे व रस्त्यावर पायाचे ठसे उमटू नये म्हणून कमरेखाली झाडू बांधण्यात आले . महार , चांभार , मांग व भंग्यानी घाणीचीच कामे करावीत . यांनी मंदिरारात प्रवेश करू नये . असे अनेक निर्बंध घालण्यात आले.
शिवशाहित समशेरी गाजवले हे शिवरायांचे मावळे पेशवाईत मनुस्मृतीमुळे अपमानित होत होते .
नागवंशातील महार , मांग , चांभार , ढोर , भिल्ल व वो.बी.सी . सारख्या असंख्य जातींनी एकेकाळी आपल्या समशेरी गाजवल्या होत्या . जेव्हा जेव्हा संधी सापडली तेव्हा तेव्हा यांनी आपल्या पराक्रमाची विजयी पताका फडकावली होती . हे नव्यानेच आलेले इंग्रज जाणून होते . म्हणूनच इंग्रजानी यांना आपल्यासोबत राहण्याचा सल्ला दिला व तुम्हाला सर्व हक्क अधिकार प्राप्त करून देऊ असे आश्वासनही दिले. पेशव्यांच्या अन्याय व अत्याचाराला कंटाळलेला हा मूलनिवासी समाज इंग्रजांच्या सैन्यात सामील झाला . ” गाव तिथं महारवाडा ” असल्यामुळे महार हे अधिक आहेत म्हणून SC ,ST NT OBC च्या रेजिमेंट ला ब्रिटिशांनी ” महार रेजिमेंट “ हे नाव दिले गेले .
दि. १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांचे ३०,००० सैनिक व मूलनिवासी महार बटालियन चे फक्त ५०० सैनिक ही लढाई सपाट भुईप्रदेशावर होती .किल्ले किंवा दरेखोरे अजिबात नव्हते. त्यामुळे व्युवरचनेला कसलीही संधी नव्हती . मनगटातील बळ व निधळ्या छातीचे धैय्य एवढीच सामुग्री वापरता येत होती . ३०, ००० पेशवेसमोर फक्त ५०० मूलनिवासी – बहुजन सैनिक युद्धाला तयार होते. इतक्या मोठ्या तफावतीची जगाच्या इतिहासातील एकमेव लढाई होती .
पुणे येथील भीमा नदीच्याकाठी कोरेगाव ची लढाई ही आत्मसन्मानाची लढाई होती . मरून जाऊ , मिटून जाऊ पण पेशव्यांच्यापुढे आम्ही हरणार नाही . शेवटच्या श्वास असेपर्यंत आम्ही लढू असा निर्धार करून ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ! हर हर महादेव !! छत्रपती संभाजी राजे चा विजय असो !!! जय मल्हार !!!! गर्जना करताच पेशव्यांचे ३०,००० सैनिकामधून २००० सैनिक हत्यार टाकून पळून गेले . उरले २८,००० सैनिक आपला एक नागवंशीय मूलनिवासी सैनिक हा पेशव्याच्या ५६ सैनिकाला कापत होता . तेव्हापासून एक म्हण रुजू झाली ती म्हणजे ” तुझ्या सारखे ५६ पाहिले ” नाना पाटेकर चा अबतक छप्पन हा चित्रपट आता येऊन गेला परंतु आमच्या मूलनिवासी बहादूर बांधवांनी १०४ वर्षांपूर्वीच हा इतिहास घडवून आणला .
सिहाच्या छातीने लढणारे हे शूरसैनिक पेशवाईच्या अन्याय , जुलूम , आत्याचार व अमानुष छळ याचा बदला घेत होते . त्यांचे शस्त्र जातीयवादी पेशवे सैतानावर तुटून पडत होते . मनगटाच्या एकटवलेल्या शक्तीतून पेशव्याच्या देहाचे तुकडे तुकडे करीत होते . रक्ताचे पाट वाहत होते. भीमा नदीचे पाणी आपला निळसर रंग बदलून लालेलाल झाले होते . शेवटी चातुर्वर्ण्य आणि मनुस्मृतीच्या शत्रूचा खात्मा झाला. ३१ डिसेंबर रात्री सुरू झालेली ही लढाई ०१ जानेवारी १८१८ रोजी रात्री ९.०० वा. हे युद्ध संपले . पेशवाई गाडली गेली व इंग्रजानी आपला झेंडा रोवला .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत