
काँग्रेससाठी अच्छे दिनचे संकेत असल्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’मधून व्यक्त होत आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये काठावरचे बहुमत मिळवून काँग्रेस पुन्हा सरकार बनवू शकते. राजस्थानात सत्ताबदल होऊ शकतो. मात्र, तेलंगणात बीआरएसला मोठा झटका बसून काँग्रेसला सत्ता स्थापनेची शक्यता आहे. मिझोराममध्ये स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व कायम आहे.
पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे ‘मिनी लोकसभा’ म्हणून पाहिले जात आहे. रविवारी (दि. 3) या पाचही राज्यांची मतमोजणी होऊन निकाल लागेल. आज विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार मतदारांचा काwल स्पष्ट झाला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. मिझोराममध्ये स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व कायम आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत