साद घालतो कबीर

प्राचार्य वसंत वावरे
काही लोकांची जीभ म्हणजे जणू तलवारच आणि या जिभरूपी तलवारीने ते समोर असलेल्याला कापत सुटतात.म्हणजे असं काही बोलतात की समोरचा मनातून पार तूटून जातो.
आपल्या बोलण्यामुळे इतरांना ज्ञान मिळालं पाहिजे. त्यांच्यात धीर, साहस,ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. बोलण्यामुळे जगण्याची उमेद तयार व्हायला हवी.कोणात दोष असतील तर त्याबद्दल योग्य शब्दात मार्गदर्शन झाले पाहिजे.
ज्यो आवै ज्यो ही कहै
बोले नही बिचार
हतै परायी आतमा
जीभ लिये तलवार
काही लोकं मनात येईल तसं बोलतात. बोलतांना काही एक विचार करीत नाही.असले लोकं आपली जिभरूपी तलवार विचार न करता चालवतात आणि त्यामुळे इतरांचे मन दुखावल्या जाते. त्यांच्या मनाला यातना होतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत