देश-विदेशमुख्यपान

मणिपूरमध्ये तणाव, 5 दिवस इंटरनेट बंद.

२५ सप्टेंबर रोजी मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या २ विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे विद्यार्थी जुलैपासून बेपत्ता होते. या दोघांची फिजम हेमजीत (२०) आणि हिझाम लिंथोईंगंबी (१७) अशी नावे आहेत. या दोघांच्या मृतदेहांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर इम्फाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढलाय.

मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा रविवार (1 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.45 पर्यंत बंद राहील. पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती.

राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी लोकांना दिले की, दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणातील दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या हत्येच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह उद्या सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील.” त्यांची उपस्थिती हे प्रकरण जलदगतीने सोडवण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधून त्यांना न्याय मिळवून देऊ, असंही एन बिरेन सिंग म्हणालेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!