देणी रखडल्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ


तीन वर्षे होऊनही देणी मिळाली नाहीत
मुंबई : शासनाचे आदेश असतानाही पालिकेच्या तब्बल ३५ कर्मचारी,
अधिकार्यांना निवृत्त होऊन तीन वर्षे झाली तरी पेन्शन,
सेवा उपदान आदी देणी मिळालेली नाहीत. सेवानिवृत्तीमुळे काम नसल्याने या निवृत्त कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे या कर्मचार्यांची प्रलंबित देणी तातडीने द्यावीत,
अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त-प्रशासक भूषण गगराणी यांना केली आहे.
महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या ३५ कर्मचारी, अधिकार्यां ना सेवानिवृत्ती वेतन व इतर देय दावे अद्याप देण्यात आलेले नाहीत.
शासनाच्या आदेशाप्रमाणे केवळ १२ कर्मचार्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.
तथापी वारंवार पत्रव्यवहार व विनंती करूनही संबंधित ३५ कर्मचारी, अधिकारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेले नाही.
त्यामुळे सदर कर्मचारी अधिकार्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवानियम,
मे. मॅट निर्णय व मे.सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित निर्णय डावलून पालिकेच्या कर्मचार्याचे सेवानिवृत्ती वेतन व इतर देय दावे रोखून धरणे बेकायदेशीर आहे.
यानुसार शासनाच्या अखत्यारीतील महामंडळे, महानगरपालिका, संस्था, विविध विभाग इ. आस्थापनामधील अधिसंख्य पदावरील कर्मचारी, अधिकारी यांना ज्याप्रमाणे त्यांच्या सर्व सेवाविषयक लाभ देण्यात आले त्याप्रमाणे वरील शासन निर्णयाप्रमाणे पालिकेतील संबंधित कर्मचारी अधिकारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग करून त्यांना सेवानिवृत्तीवेतन व इतर अनुषंगिक लाभ देण्याबाबत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष
बाबा कदम, उपाध्यक्ष
संजय कांबळे-बापेरकर यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत