निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

निवडणुकीचा तिसरा टप्पा सुद्धा उदासीन राहणार आहे. – अशोक सवाई

आपल्या देशातील लोकं कोणत्याही लाटेवर मोठे स्वार होत असतात. कुंपनावरचे मतदार (फ्लोटिंग वॉटर) हे लाटेच्या बाजूनेच मताधिकाराचा हक्क बजावतात. २०१९ मध्ये पुलवामाची कृत्रिम लाट तयार करण्यात आली होती. मतदार त्या लाटेत वाहून गेला होता. २०१४ च्या निवडणुकीच्या आधी अण्णा हजारेंनी कांग्रेस विरोधात लाट निर्माण केली होती. तशीच आता उदासीनतेची लाट आली आहे. त्यामुळे भाजपचा पारंपारिक वोटर वोट देण्यासाठी घराच्या बाहेर पडलाच नाही. म्हणून वोटींगची टक्केवारी घटली. घटलेली टक्केवारी भाजपची असल्याने गुजरात लाॅबी हैराण परेशान झाली. तसेच भाजपचे सारे डावपेच फेल होतांना दिसत आहे. त्यामुळे ती वैध अवैध रितीने ही निवडणूक कशी जिंकता येईल यासाठी ही लाॅबी अर्ध्या अर्ध्या रात्री पर्यंत मिटिंगा घेत आहेत.

देशाचे अजून भयानक नुकसान होईल अशी भाजपने कोणतीही कृती किंवा कृत्रिम लाट निर्माण करू नये किंवा तसे डावपेच किंवा षडयंत्र आखू नयेत. कारण अवैध मार्गाने निवडणूका जिंकण्याचा मागील दोन निवडणुकीचा भाजपचा इतिहास आहे. आता दोन टप्प्यातील उदासीनता पाहून तिसऱ्या टप्प्यातही मताधिकारासाठी मतदार बाहेर पडणार नाहीत असे वाटते.

अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!