निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

अखेर नारायण राणेंचा मार्ग मोकळा; चर्चेअंती किरण सावंत यांची माघार !

सिंधुदुर्ग : लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली तरी जागावाटपाचा तिढा कांहीं सुटेना. बहुचर्चित कोकणातील सिंधुदुर्ग च्या जागेवर राणे आणि सावंत हे दोघेही अडून राहिल्याने निर्णय होत नव्हता.

मात्र काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्वाची अर्थपूर्ण चर्चा केल्यानंतर सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावा सोडला आहे. उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेत दावा सोडत असल्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदेंना कोणताही त्रास होऊ नये. त्यासाठी आम्ही चार पावलं मागे जात आहोत. मात्र याचा अर्थ भय्या (किरण सामंत) थांबले आहेत असा होत नाही. त्यांना आम्ही खासदार करणारच, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडत आहोत. भाजपच्या उमेदवाराचं काम आम्ही पूर्ण ताकदीनं करू त्यांना निवडून आणू, असं सामंत म्हणाले. किरण सामंतांना भाजपनं कमळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्यांनी त्यास नकार दिला. भाऊ शिवसेनेत आहे. आपण भाजपच्या तिकिटावर लढल्यास वेगळा संदेश लोकांमध्ये जाईल याचा विचार किरण यांनी केल्याचं सामंत यांनी सांगितलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!