केंद्राने घटना दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही -अशोकराव चव्हाण

राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला आहे. मात्र मराठा आरक्षण केंद्र सरकारवर अवलंबून असून जोपर्यंत राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळू शकत नसल्याचा दावा, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.सरकारनं दाखवलंय गाजर, केंद्र सरकार च्या घटना दुरुस्तीशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार जास्तीत जास्त 50 टक्के रिझर्वेशन हे विविध लाभार्थींना देण्याची घटनात्मक तरतूद आहे 50% च्या वरती आरक्षण गेले असता ते अवैध ठरते म्हणून मराठा समाजाला देण्यात येणारे आरक्षण हे 50 टक्केच्या अटीमध्ये बसवणे जिकेरीचे आहे. म्हणून अशोकराव चव्हाण म्हणतात की जोपर्यंत घटनादुरुस्ती होणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणे अशक्य आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत