धरिञी विघालयात पर्यावरण पूरक रंग बनवण्याची कार्यशाळा संपन्न

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचालित धरित्री विद्यालय अलियाबाद येथे पर्यावरण पूरक रंग बनवण्याची कार्यशाळा यशस्वी राष्ट्रीय हरित सेना वनविभाग तुळजापूरच्या वतीने धरित्री विद्यालयात पर्यावरण पूरक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी हे होते तर कार्यक्रमाचे अतिथी शहाजी देशमुख , (वन परिमंडळ अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर ,तानाजी पवार सामाजिक वनीकरण विभाग तुळजापूर व सहकारी निलेश राठोड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींनी इतिहासाचे रंग रूप हे या स्वागत गीताने केले या कार्यशाळेचे प्रमुख श्री संजय भोईटे सर पर्यावरण प्रेमी व पक्षी अभ्यासक, वनविभाग जुन्नर ,पुणे) हे होते.यांनी येणाऱ्या रंगपंचमीला रासायनिक रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करून हा सण कसा साजरा करावा याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.रासायनिक रंगामुळे मानवाला होणारे घातक परिणाम याची जाणीव करून दिली तसेच कर्करोगासारखाही विकार या रंगाद्वारे जडू शकतो असे सांगितले. नैसर्गिक रंग दोन प्रकारे तयार करता येतात. सुखा रंग व
ओला रंग सुक्या रंगांमध्ये निसर्गातील फुले, हळद, बेसन पीठ, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, मेंदीची पाने, कोळसा इत्यादींच्या वापरातून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष रंग तयार करून घेतला.तसेच ओल्या रंगांमध्ये आवळा, बीट,पळसाची फुले ,कात तसेच हिरव्या पालेभाज्या इत्यादींचा वापर करून विद्यार्थ्यांकडून ओला रंग तयार करून घेतला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सातलगावकर अण्णाप्पा यांनी केले तर आभार श्री रमेश चव्हाण यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत