सम्राट अशोकाची अखंड भारतावरील 1200 वर्षाच्या वैभवशाली राजवटीचा इतिहास मांडावा लागेल- अँड एस के भंडारे

हरियाणा, चंदीगड कार्यकारिणी पुनर्गठन संपन्न
दिल्ली ( संघसेनयांचेकडून)- चक्रवर्ती प्रियदर्शि सम्राट अशोक यांनी अखंड भारतावर 1200वर्षे राज्य केले त्यावेळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असे लोक म्हणतात, त्यांच्या काळात खुपिया, गुप्त एजन्सी होत्या त्या सम्राट अशोकला राज्याचा गुप्त रिपोर्ट द्यायचे परंतु तो कोणी दिला त्याचे अधिकारी कोण आहेत याची कोणालाही व राज्यातील मंत्र्यांनाही माहिती नव्हते. आता ED,CBI,IB चे कोण आहेत ती सर्व माहिती व त्यांची कारवाईची माहिती उघड होते व राजकीय वैऱ्यासाठी उपयोग केला जातोय असे दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी सांगितले. अँड भंडारे पुढे म्हणाले की,एवढेच नव्हे तर सम्राट अशोक यांनी धम्म प्रचारासाठी आपला मुलगा महामहेंद्र व संघमित्रा यांना श्रीलकेस पाठविले, त्यांनी अखंड भारत देशात 84हजार स्तूप, लेणी, लेख निर्माण करून बुद्धाच्या समतेचा प्रचार प्रसार केला. त्यानंतर देशावरील निजाम/मुस्लिम यांची सुमारे 400 वर्षे व इंग्रजांची 150
वर्षाची राजवट होती, त्यांचा इतिहास सांगीतला जातो मात्र सम्राट अशोकाच्या अखंड भारतावरील 1200 वर्षाच्या वैभवशाली राजवटीचा भारताला विसर पडला आहे, तो पुन्हा मांडावा लागेल, तसेच आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकाराच्या माध्यमातून शिक्षण, नोकरी, राजकीय सत्ता, सामाजिक, राजकीय प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त झाले परंतु ते विषमतावादी विचार सरणीच्या लोकांना सहन होत नाही त्यामुळे संविधान बदलण्याच्या भाषा केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर आपल्यातील मतभेद विसरून संविधान समर्थक समाज म्हणजे शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत कबीर, संत रोहिदास, शाहू महाराज,सावित्रीमाई, अहिल्याबाई, अण्णाभाऊ साठे, आदी समता के महामानव के विचार धारेचा SC,ST,OBC, अल्पसंख्याक समाज, जनतेने एकत्र येणे गरजेचे आहे असे सरांवशाने प्रतिपादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांनी सम्राट अशोक जयंती चैत्यभूमी, दादर , मुंबई येथे मोठ्या पद्धतीने साजरा करण्यास सुरुवात केली आहे आणि आता 5 एप्रिल रोजी दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल याच्या माध्यमातून संपूर्ण देशात साजरी केली जात असल्याची माहिती अँड. एस के भंडारे यांनी दिली, तसेच जेथे तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात नाही त्याचे सर्व ट्रस्टी बौद्ध नाहीत तो 1949 चा महाबोधी महाविहार कायदा रद्द करण्यासाठी 12 फेब्रुवारी पासून आंदोलन चालू आहे त्याची राज्य व केंद्र सरकारने अद्याप दखल घेतली नाही त्याबाबत आणि अल्पसंख्यक मुस्लिम समाजाचे वफ्फ बोर्ड मध्ये गैर मुस्लिम सदस्य समावेश करण्याचा कायदा करत आहेत हे अन्याय कारक आहे असे मतही अँड भंडारे यांनी. दि.4,5, 6एप्रिल रोजी दिल्ली, चंदीगड, पंजाब व हरियाणा राज्य/प्रदेश शाखेअंतर्गत सम्राट अशोक यांची 2329 वी जयंती व संविधान समर्थक जोडो अभियान आणि राज्य/प्रदेश कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रमात अनुक्रमे दिल्ली येथील बुद्धविहार ,डॉ आंबेडकर भवन, राणी झाशी रोड, नवी दिल्ली, डॉ आंबेडकर भवन, सेक्टर 37,चंदीगड, आणि डॉ भीमराव आंबेडकर उच्च विद्यालय, रोहतक, हरियाणा येथे मांडले. प्रत्येक बैठकीच्या शेवटी सर्वांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक सामूहिक वाचन करून शपथ घेतली.
चंदीगड व हरियाणा कार्यकारिणीचे पुनर्गठन पुढीलप्रमाणे करण्यात आले .चंदीगड प्रदेश – स्वामी चरण, सरचिटणीस – ईश्वर सिंह कटारिया , उपाध्यक्ष मंजू गौतम, ओमप्रकाश इंदल, सतबीर सिंह तंवर सचिव – सुमन छाब्बिया , नितीश कटारिया, शिशुपाल भंडोरिया आणि हरियाणा राज्य – अध्यक्ष – जयशील जे के आर्या , सरचिटणीस संदेश बौद्ध, उपाध्यक्ष- रणबीर सिंह, आशा बौद्ध, सुभाष चन्द्र बौद्ध, वीरेंद्र बौद्ध ,सचिव – सुरेन्द्र आंबेडकर, सत्यवीर सिंह बडगुजर, अमरजित बौद्ध, संघटक योगेंद्र सिंह, संदिप बौद्ध, कमलजीत, हर्षवर्धन हनुमान बौद्ध इत्यादी या कार्यक्रमासाठी कपूर सिंह सिंघल (राष्ट्रीय उपाध्यक्ष), फौजी इंडिया (राष्ट्रीय संघटक), आर एस गौतम (राष्ट्रीय संघटक) इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दिल्ली प्रदेश अध्यक्ष कपूर सिंह कटारिया बौध्द यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, दिल्लीतील डॉ आंबेडकर भवन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला येत्या 6डिसेंबर रोजी अभिवादन केले जाईल व दिल्ली राज्य शाखेचे दि. 26/9/2025 ते 5/10/2025 या कालावधीत श्रामनेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर घेणे आणि तो पर्यंत सर्व ठिकाणी शाखा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला .यावेळी दिल्लीतील पदाधिकारी यांना संस्थेचे आजीवन बौद्ध सभासद कार्ड एस के भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सूत्र संचालन दिल्ली प्रदेशचे सरचिटणीस नरेंद्रकुमार बौध्द यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत