दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

८ मार्च अर्थात जागतिक महिला दिवस

डॉ. दिलीपकुमार कसबे

       8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो.हा महिलांच्या सन्मानाचा ,हक्काचा,अधिकाराचा दिवस आहे.खरे म्हणजे या दिवशी अनेक क्षेत्रात विजयी यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार त्यांचे कौतुक करण्याचा दिवस आहे.अनेक महिला मंडळे,शासकीय निमशासकीय, कार्यालयातील स्त्रियांच्या विशेष कार्या बद्दल सन्मान तर केलाच जातो.पण सर्वच महिला या दिनाच्या मानकरी आहेत.असे म्हणावे लागते.विविध उपक्रमांनी हा दिवस मोठ्या संख्येने महिला साजरा करतात.

     हा दिवस म्हणजे महिलांच्या हक्कासाठी, चळवळीचा एक महत्वाचा दिवस मानला गेलेला आहे.1908 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात नोकरी करणाऱ्या महिलांनी एक रैली काढून कामानुसार  कामगार महिलांचे वेतन,कामाचे तास कमी करणे, मतदानाचा हक्क मिळावा अशा काही महत्वाच्या हक्का बाबत 15 ते 16 हजार महिलांनी भाग घेऊन मागणी केलेली होती. त्यानंतर 1911 मध्ये डेन्मार्क, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया या देशामध्ये पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.व पढे युनायटेड नेशन्स ने 8 मार्च 1975 ला हा दिवस एका विशेष मोहिमेअंतर्गत  साजरा केला .तेव्हापासून या दिवसाची खर्या अर्थाने सुरूवात झाली. व हा दिवस महिला दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

     जगामध्ये पुरूषांनी नेहमीच आपल्या बळाचा,शक्तीचा वापर करून महिलांना आपल्या हक्कामध्ये पूर्वीपासूनच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.म्हणजेच ' बळी तो कान पिळी.' स्त्रियांना पुरूषाबरोबर समानतेचा हक्क जरी कायद्याने दिला गेला असला तरी वास्तव चित्र काही वेगळेच पहायला मिळाल्याशिवाय दिसणार नाही.'हमारी कथनी और करनी में अतंर है' आम्ही बोलतो एक ,मात्र वागतो वेगळेच.पुरूष आणि स्त्री यांचे नाते अतुट आहे, स्त्री शिवाय कुटुंबाची संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही.आई,बहिण, मावशी, पत्नी ,वहिनी,मैत्रीण,अशी कितीतरी नाती आहेत.त्याच्यासाठी हव्यात महिला.स्त्री नाही तर त्या घराला घरपण ही येत नाही. म्हणतात ना  यशस्वी पुरूषाच्या यशाच्या पाठीमागे कोणीतरी स्त्रीच असते. म्हणजेच स्त्रिया नसतील तर हे जग ही अपूर्णच आहे.म्हणून निसर्गाने हे दोन जीव जन्माला घातलेले आहेत.त्यामुळेच मानवी सृष्टि चा उगम झाला असे म्हणावे लागते. पूर्वी नाटकात स्त्रियांची भूमिका पार पाडण्यासाठी स्त्री मिळतच नसायची.पण तरी सुद्धा पुरूष स्त्रियांची भूमिका करायचे.म्हणजे प्रत्येक क्षेत्रात महिला हवी असतेच. पण तिच्या अधिकारावर,हक्कावरती पुरूषांनी अतिक्रमण केलेले दिसते आहे.खरे म्हणजे केवळ लिंगभेद आहे.महिला  या कोणत्याच बाबतीत पुरूषापेक्षा कमी नाहीत.सैन्य,वाहतूक व्यवस्था, वाहन चालविणे, पोलीस अशा सर्वच क्षेत्रात ती पुरूषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतांना दिसत आहे.

  1910 मध्ये जर्मनी च्या मार्क्सवादी विचारसरणीच्या क्लारा जेटकिन या श्रमिक महिलेने महिलांच्या परिषदेत कोपनहेगन या ठिकाणी महिलांच्या हक्काची कल्पना मांडली.त्यावेळी 17 देशाच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या.तर1917 मध्ये रशियातील महिलांनी युद्धाच्या काळात ब्रेड आणि पीस च्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करून सम्राट निकोलसला पद सोडण्यास भाग पाडले.त्यामुळे त्या महिलांना पुढे मतदानाचा ही हक्क मिळाला. जेव्हा ते काम बंद आंदोलन झाले  ती तारीख होती 23 फेब्रुवारी. त्यावेळी  रशियात ज्युलियन कैलेंडर  वापरले जायचे.  परंतु ग्रेगरियन कैलेंडर नुसार  हा दिवस होता 8 मार्च .आणि म्हणूनच हा दिवस साजरा करतात.भारता मध्ये 11 एप्रिल 1947 मध्ये कायदामंत्री या नात्यांने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कासाठी संसेदत हिंदू कोड बिल मांडले. 1951- ते 1954 पर्यंत त्याची मांडणी झाली.  पण एकमत होऊ शकले नाही.म्हणून त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाहेर ही पडले. म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी ते शेवट पर्यंत लढत राहिले. 

    महिलांचा सन्मान हा आपला सन्मान, एक स्त्री शिकली तर सर्व कुटुंब सुशिक्षित होते. आई जिजाऊंच्या प्रेरणेने  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिका, रमाबाईंचा मोठा मानसिक आधार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांना मोठा आधार होता. म्हणून आपण अशा सर्व महिलांचा आदर्श मांडला पाहिजे, घेतला पाहिजे. एनी बेसेंट,मदर टेरेसा,फातिमा बीबी, कितीतरी महिला जीवनात पुढे आदर्श ठेऊन गेल्या आनंदीबाई गोपाळ जोशी,अवनी चतुर्वेदी, इंदिरा गांधी,  प्रतिभा देवीसिंह पाटील,कल्पना चावला,दुर्गाबाई कामत,प्रिया जिंधन, सध्याच्या आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु .तेव्हा जागतिक महिला दिनापासून (आंतरराष्ट्रीय महिला दिवस) आपण मोठ्या प्रमाणात सर्वच महिलांचा आदर करूया,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सर्वच क्षेत्रात महिला पुढे आल्या पाहिजेत म्हणून त्यांचा सन्मान करूया.


              डॉ. दिलीपकुमार कसबे
               स.गा.म.कॉलेज,कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!