संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – ८

*गुरू रविदास जयंती निमित्त..पुष्प ८ वे
ग्यानह कारनि रिपु बिलमाइ,कलिमल नसइ विमल बुधि पाइ!
धरम सुकरम सोभा अधिकाइ, ग्यान मूल कछु अवर न भाइ!!
या दोह्यात गुरूजी ज्ञानाचे महत्व समजाऊन सांगतात…समोरचा शत्रु किती ही प्रबळ शत्रु असू दे तो ज्ञानाने शरण येतो. शत्रु म्हणजे फक्त मानवी अमानवी प्रतिस्पर्धी नव्हे .तो शत्रु तर शरण येतोच येतो पण ,मनांतील अदृश्य षड्रिपू हे मानवाचे शत्रू आहेत.
या षढरिपु मुळेच जगात दूख पसरले आहे. या दुःखाचे कारण मनातील लालसा आहे. या लालसेने जगात लढाया होतात. राग, लोभ, मद, मत्सर, मोह हे सहा विकार आहेत.या विकारामळे तृष्णा वाढते.जगात दुख आहे. दुःखा पासून मुक्ती हवी असेल तर तलवार म्यान करा ग्यान प्राप्त करा…! अज्ञानाला हरवून पळवून लावा.ज्ञान प्राप्त होताच मनातील काळेपणा, अंधार दूर होऊन ज्ञानाचा उजेड पडतो .जगातील सारी दुखे हे ज्ञान प्राप्तीने सुखमय होतात..धर्म करम म्हणजे जगण्याची व कमवण्याची दृष्टी बदलून आयुष्याची शोभा अधिक वाढते. ज्ञान हे मुळ तत्त्व आहे…! तथागत गौतम बुदधाने महावीर महात्म्यांनी शांतीचा मार्ग सांगितला आहे . तसाच आणि तोच हा मार्ग आहे.ज्ञान प्राप्तीने होणार मनचंगा मन हे मनाचे कैवल्य स्वरूप आहे. असे मनचंगी ज्ञान प्राप्त कसे करायचे शिक्षणाने अभ्यासाने , सरावाने तथा अनुभवाने तर ज्ञान मिळतेच पण ते सत्संग,हरिला अन्यन्य भावाने शरण जाऊन भक्ती साधना केल्याने आणि हो… अहंकार सोडल्याने मिळते…!
सुवरन होत कुवरन कुधातु,पारस परस सुगिआन सुधातु..!
ग्यान ज्योति जग मांहि परगासी, संत हेत सरब सुखरासी!!
गंजलेले लोखंड परीस स्पर्शाने जसे सोन्यागत चमकते तसे अज्ञानी व्यक्तीला ज्ञानाचा स्पर्श झाल्यावर ज्ञान ज्योती सारखा तो तळपतो..! कासव, मासा ,कराला म्हणजे दुर्गा, नरसिंह, विष्णु, ब्रम्हदेव ,राम हे देवाचे अवतार नाही तर ज्ञानाचे अवतार आहेत.हे ज्ञानी व ध्यानी मुनी ओळखतात…(याबद्दल आपले अज्ञान आहे.) .हे ज्ञान आम्हां सर्वांना गरू रविदास कृपेने लाभो ही गूरू चरणी वंदना..!
जय रविदास..!!
लेखक. ॲड.आनंद गवळी
राष्ट्रीय उपाध्यक्ष – राष्ट्रीय चर्मकार महासंघ
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत