भारतीय संविधान श्वासोच्छवास

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर. दि. 26 फरवारी 24.
*आपल्या भूकेकंगाल लोकांनी भाविकतेच्या गुंत्यात अडकवून घेऊ नये, भक्तीभाव ही विवेक शक्तीस लुळी करणारी एक प्रकारे अफूची गोळीच आहे* असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...पुढे म्हणतात -
*भक्तीने त्यांना तेजोहीन बनविले आहे. देव भोळेपणाच्या वृत्तीमुळे त्यांचे मज्जातंतू ठिसूळ, क्षीण आणि दुर्बळ झाले आहेत*....
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.516. पैरा – पहिला.
जरी भारताला स्वराज्य मिळाले असले तरी स्वातंत्र्याची उस्टी फळे बहुजनांच्या वाट्याला येतील का ही शंका त्यांच्या मनी होतीच आणि ते चांगल्या प्रकारे दूरदृष्टीपणा ठेऊन ब्राह्मणवाद्याचा चतुरपणा हेरून होतेच त्याच अनुषंगाने त्यांनी मनुस्मृतीला जाळून भारतीय संविधानाची निर्मिती केली.आणि ते कृती मधून म्हणतात –
मी भारताची घटना लिहिली असून भारतीय घटनेचा मी शिल्पकार आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या विश्वातील संविधानाचा अभ्यास करून, भारतातल्या लोकांवर होत असलेला अन्याय, अत्याचार दूर करुन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे त्राते आणि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी असून भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व होते. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ती एक सोनेरी पान आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येने ( ध्यान साधनेतून नव्हे ) अलौकिक धैर्याने नि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी ते अविरत झगडत होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माणसा माणसा जो धर्म पंक्तीप्रपंच करतो, कोट्यावधी लोकांना त्यांचा स्वतःचा अपराध नसता गुन्हेगारापेक्षाही वाईट रीतीने वागवितो, विशिष्ट वर्गातल्या लोकांना पिढीनीपिढ्या इहलोकाच्या नरकयातना भोगावयास लावतो माणूस असून त्यांना जनावरांनाही मिळणाऱ्या सवलती मिळत नाही तो धर्म कसला? हीच भावना आणि दुःख त्यांच्या मनात सलत होती.
भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उष्ट्या फळाला झुगारून आपल्या आगाढ बुद्धिमत्तेच्या जोरावर बुद्धाच्या खऱ्या तत्त्वज्ञानाला ओतून सर्वांना समान हक्क, न्याय भारतीय संविधानाद्वारे प्रदान केले. खरी लोकशाहीची मुळे त्यात ओतली.आणि आपणा सर्वांचे बोट धरून पवित्र दीक्षाभूमीवर स्वतः धम्मदिक्षा घेऊन आपणा सर्वाना बुद्धाच्या मार्ग पथावर आणून ठेवले हे कार्य भूतो ना भविष्य सारखे फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरच स्वाभिमानी, नीतिमत्ता आणि अगाढ बुद्धिमत्तेच्या भरोशावरच करू शकले.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे उपकार आणि ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही.महामानवास त्रिवार वंदन….! ????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत