बाबासाहेबांच्या कार्यात रमाईंनी खंबीर साथ दिली.-बाळासाहेब सरतापे


‘हिंगणीत रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी’
वरकुटे-मलवडी: वार्ताहर
स्वाभिमानी,प्रतिभावंत आणि त्यागमुर्ती असलेल्या आई रमाईंनी हालाखीच्या परिस्थितीतही,शांतता आणि संयमाने घरसंसार सांभाळत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मोलाची साथ दिली.माता रमाईने संसारात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करीत,परिस्थितीचा सामना केला.संकटकाळात स्वतःला सावरत त्यांनी कुटुंबासह समाजासाठी काया झिजवली.यामुळेच रमाबाई आंबेडकर या तमाम दलितांच्या रमाई झाल्याचे मत भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब सरतापे यांनी व्यक्त केले.
हिंगणी ता.माण येथील बौद्ध विहारात दिनांक ७ फेब्रवारी २०२४ रोजी, बौद्ध भगिनींनी कार्यक्रमाचे आयोजन करीत माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी केली.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी महिला संघटक निलाबाई सरतापे,सुनिता सरतापे,उमाताई भंडारे अंजली सरतापे,ज्योती सरतापे,रेश्मा सरतापे,राहुल सरतापे,महावीर सरतापे,तात्यासो सरतापे,अशोक सरतापे,नाना भंडारे,विकास सरतापे,आदी महिला उपस्थित होत्या.बाळासाहेब पुढे म्हणाले,बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले.त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांचा,प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही.याप्रसंगी सुनिता सरतापे,निलाबाई सरतापे यांनी रमाईचा त्याग व जीवनाकार्याविषयी माहिती सांगितली.सुरूवातीला समस्त महिलांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या प्रतिमांसमोर मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून पुष्प सुमने अर्पण करण्यात आली.तदनंतर समस्त महिलांसह उपस्थितांनी सामुदायिक पद्धतीने त्रिसरण पंचशिल ग्रहण करीत बुद्ध पुजा केली.यानंतर उपस्थित सर्व धम्म बांधवांनी एकमेकांस शुभेच्छा दिल्या.शेवटी सर्वांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत