
ओबीसींच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं आहे. काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांना थेट सवाल केले आहेत. संसदेतील खासदार हे केवळ पुतळे आहेत. या देशातील ओबीसी देश चालवत नाहीएत, असं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी म्हणाले, “महिला आरक्षण आजही लागू होऊ शकतं. ३३ टक्के आज ज्या जागा आहेत त्या लोकसभा आणि विधानसभेत दिल्या जाऊ शकतात. खूप अवघड बाब नाहीए ही, पण सरकारला ते करायचं नाही. कारण खरी गोष्ट ही आहे की, हे आरक्षण दहा वर्षानंतर लागू होणार आहे. ते पण होईल की नाही हे माहिती नाही. त्यामुळं हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. दिशाभूल कशावरुन होत आहे तर ती ओबीसी जनगणनेपासून होत आहे”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत