
हवामान बदल आणि वाढत्या जागतिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत आहे. ‘विश्वासाचं पुनर्निर्माण’ ही या परिषदेची संकल्पना आहे. दावोस इथे ५४व्या जागतिक आर्थिक परिषदेला काल सुरुवात झाली. डीपफेक, हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा उद्घाटन सोहळा सहारा वाळवंट आणि अमेझॉन जंगलाला समर्पित करण्यात आला होता. या पाच दिवसांच्या परिषदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी भारताचे प्रतिनिधित्व करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या परिषदेत सहभागी होत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत