दिन विशेषदेश-विदेशमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रमुख्यपान

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

१५ ऑगस्ट१९४७ रोजी आपण राजकिय स्वातंत्र्य मिळवले. सामाजिक विषमता सोबत घेऊन आपण प्रजासत्ताक भारतीय झालो. सामाजिक विसंगतीपूर्ण वातावरणात ७५ वर्षे सरुन गेली. लोकशाहीच्या संवर्धना ऐवजी निर्मूलनाचा कार्यक्रमआस्ते कदम टप्प्याटप्याने यशस्वी होताना दिसत आहे.

वरच्या वर्णाची हुकूमशाही – वर्ण व्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाकडे वाटचाल करीत आहे.
जेव्हा बॅलेट होत होते तेव्हा बुध कॅप्चरींग ने जनादेश फिरवला जायचा. आता ईव्हीएम ची भुमिका संशयाच्या घे-यात आहे.
प्रशासनातले उच्च वर्णिय आता शत प्रतिशत संसदीय राजकारणात स्थिरावलेत.
मिडीयातील उच्चवर्णीय एकांगी प्रचार करत मोकाट झाले आहेत.
सर्वोच्च वर्णाकडे एकहाती सत्ता आल्येय त्यांनी सरंजामी जरब व मक्तेदारी सुद्धा खतम केलीय.
मधल्या स्तरातील सवर्ण घटकांना धर्म ध्रुवीकरणात गुंतवून बहुसंख्याकीय समर्थन प्राप्त करण्याचे राजकारण फत्ते होत आहे.
तळच्या घटकांचे समाजनेते युती आघाडी या मार्गे सत्तेत मिळेल तो वाटा घेत आहेत
प्रबळ विरोधी पक्ष म्हणजे संसदीय लोकशाहीचा प्राण निष्प्राण होऊ घातला आहे.
अशाप्रकारे बहुजन जनता संपूर्णतया विखुरली आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीक्षेपातील सामाजिक लोकशाही स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे झाली तरी इंचभरही पुढे सरकली नाही.
सत्तर वर्षातील मुख्य सत्ताधारी काॅन्ग्रेसवर टिका करत भाजपाचा पर्याय पुढे आला आहे.
परंतु याच ७०-७५ वर्षात शासन प्रशासन माध्यम व न्यायसंस्था यांनी सवर्णवादी वर्चस्वाच्या सोशल ऑडीटवर चकार शब्द काढला नाही.
मध्ययुगीन जात आइडेंटिटी चिवटपणे टिकून आहे. आपण एकजिनसी सिविल सोसायटी बनण्याकडे बेबी स्टेप सुद्धा अजून घेतली नाही.
आपल्या मागून चीनसह दक्षिण आशियाई, मध्यपूर्व, लॅटीन अमेरीकन, सत्ता पुढे गेल्या.
मेन मिडीया सोबतच लाखों-करोड़ों चे व्ह्यूअर लाभलेला सोशल मिडीयाही आज उच्चवर्णीय मंडळींनी व्यापला आहे.
फिल्म कला संगीत यात तसेच उद्योग क्षेत्रात ‘पाहीजे जातीचे’ असे वातावरण आहे
आपले एक्कादुक्का कार्यकर्ते १००-२०० व्ह्यूच्या पल्याड जात नाहीत. काॅमेंटस च्या रकान्यात गलिच्छ प्रतिक्रियास्वरूप गटारं वाहत आहेत.
मध्यमवर्ग संख्येने खूप मोठा आहे, एक तर तो आता कुठे स्थिरावला आहे. आतापर्यंत कष्टाने केलेली कमाई गमावू नये यासाठी तो या कोलाहलात तटस्थ राहणे पसंद करतो.
सो काॅल्ड पुरोगामी आर्थिक समतावादी यांना एतद्देशिय आंबेडकरी विचारांवर राजकिय मुख्यप्रवाहात ठळक परिणाम साधण्याच्या दृष्टिकोणातून निरुत्साहित करणारे वातावरण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जातविरहीत समता, विवेकी स्वातंत्र्य, मानवीय बंधुता व सार्वकालिक सामाजिक न्याय यांची सकस प्रतिष्ठापना अपेक्षित आहे.
आज बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी त्यांचे स्मरण करताना मनात आगामी काळासाठी सामुदायिक संकल्प घेणे ही काळाची निकड आहे.
🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!