भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

भाजप आणि दलित राजकारण ……

डॉ.संजय दाभाडे,
पुणे…..
9823529505
sanjayaadim@gmail.com

महाराष्ट्रातील महार जात वगळता देशभरातील दलित जातींनी ब्राम्हणी धर्म त्यागला नाही. दलित राजकारणाने अँटी – हिंदू ही भूमिका आता पातळ केली किंवा आता ती पूर्वी सारखी अपिलिंग राहिली नाही.

ह्याच काळात हिंदुत्व राजकारणाने कूस बदलली. एकीकडे राम मंदिराच्या माध्यमातून गाय पट्टयात हिंदू अस्मिता अधिक मजबूत केली तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नकार न देता त्यांचा स्वीकार ( वैचारिक पातळीवर नव्हे….! ) करण्याला सुरुवात केली. ह्यातून भाजपने मोठ्या प्रमाणात दलित राजकारण विभाजित केले , दलित व्होट बँक स्वतःकडे वळविण्यात यश मिळू लागले.

उत्तर प्रदेशात बसपला 2014 मध्ये संसदेची एकही सीट जिंकता आली नाही…..!

2009 साली भाजप कडे खासदारकीच्या दलित राखीव जागा होत्या फक्त 12 , 2014 मध्ये त्या झाल्या 40 तर 2019 मध्ये त्या झाल्या 46…..!

2009 साली भाजपचे दलित व्होट शेअरिंग होते फक्त 15 टक्के , 2019 मध्ये ते झाले 35 टक्के.

एकंदरीत मुद्दा असा की किमान गाय पट्टयात तरी दलित व्होट बँक बिजेपी कडे गेली आहे. दलित राजकारणाने देखील कुस बदलली आहे आणि दलितांचे अँटी हिंदू संस्कृतिक राजकारण मागे पडले आहे.

खुद्द दलितांनी स्वतःच्या राजकारणाची कूस बदलली असेल तर मग ओबीसी राजकारण अँटी – हिंदुत्व म्हणून पुढं येईल असा भ्रम कुणी बाळगत असेल तर ते कितपत योग्य राहील हा मुद्दा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!