वीर बाल दिनानिमित्त…

ते आज भारत मंडलम इथे आयोजित वील बाल दिवस कार्यक्रमाला संबोधित करत होते. वीर बाल दिन पाळणे हे देशाच्या स्वातंत्र्योत्तर अमृतकाळात सुरु झालेला नवा अध्याय आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत भारत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचंही त्यांनी सांगितलं.अर्थ,विज्ञान,संशोधन,क्रीडा आणि धोरणात्मक कार्यात भारत नव्या उंचीवर जात असल्याचंही ते म्हणाले.सध्याचे दिवस हे भारताचे आहेत.पहिला बाल दिवस गेल्यावर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. देशाच्या रक्षणासाठी शौर्य आणि त्यागाची पराकाष्ठा करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र साहिबजादास बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या प्रकाश पुरब या दिवशी पत्करलेल्या हौतात्म्याच्या स्मृती प्रित्यर्थ पाळला जातो.गृहमंत्री अमित शाह यांनीही बाल वीर दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. क्रूर अशा मुघल सैन्याला शरण न जाता या वीरांनी हौतात्म्य पत्करलं असंही शाह म्हणाले.या दोघांचं हौतात्म्य युगानयुगं प्रेरणादायी राहिल अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली आदरांजली वाहिली आहे.नांदेड वीर बाल दिनानिमित्त आज दुपारी ४ वाजता सर्वधर्म संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.श्री सचखंड गुरुद्वारा साहिबचे मुख्य जथेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे सहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरु ग्रंथ साहिब भवन इथं होणाऱ्या या सर्वधर्म संमेलनास पालकमंत्री गिरीश महाजन, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉ.विजय सतबीरसिंह,पंजाब येथील मंत्री हरभजन सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत