नांदेड जिल्ह्यात देलगर तालुक्यातल्या लेंडी प्रकल्पाबाबत आधी पुनर्वसन करण्याची शेतकऱ्यांची भूमिका…

धरणाला विरोध नसून पुनर्वसना संदर्भात सर्व कायद्यांचं पालन झालं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात देलगर तालुक्यातल्या लेंडी प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी आधी पुनर्वसन करण्याची भूमिका घेतली. या भूमिकेला ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर पाठिंबा दर्शवला असून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.१९८६ मध्ये मंजुरी मिळालेल्या लेंडी प्रकल्पासाठी पुनर्वसनाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नसून या प्रकल्पात बाधित झालेल्या सर्वांना नियमानुसार मोबदला मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.लेंडी प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त आणि शासन प्रतिनिधी यांची लवकरच बैठक होईल असेही पाटकर यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत