महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

दंगली घडवण्याइतपत भुजबळ बोलायला लागलेत- मनोज जरांगे

राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र टिकणारं आरक्षण द्या, अशी मागणी ओबीसी नेते करताना दिसत आहे. अशात काल जालन्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. यानंतर जरांगे यांनी देखील भुजबळांवर आरोप केले आहेत.

इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्य पाहता त्यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेतस, असा आरोप केला. छगन भुजबळांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे रावध रहा, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हाययचं म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरुन अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना देखील समजावून सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आलं आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणूस ओबीसींसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!