झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआरचा दर वधारला असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता.

धारावीतील टीडीआर दोन ते तीन पट महाग असल्याने आणि तो तातडीने उपलब्ध होणार नसल्याने सध्या झोपडपट्टी पुनर्वसनातील ‘टीडीआर’ची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, झोपडपट्टी पुनर्वसनातील टीडीआरचा दर वधारला असून घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने अदानी समूहाला आधीच अनेक सवलती दिल्या असून आता तेथील पुनर्विकासातून निर्माण होणारा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) खरेदीची सक्ती अन्य विकासकांवर करण्यात येणार आहे.
धारावी पुनर्विकासातून निर्माण झालेल्या ‘टीडीआर’पैकी ४० टक्के ‘टीडीआर’ खरेदी करणे विकासकांना अनिवार्य करण्याबाबतची अधिसूचना नगर विकास विभागाने ७ नोव्हेंबरला जारी केली. त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘‘राज्य सरकारच्या या निर्णयामुळे टीडीआर बाजारपेठेत अदानी समूहाची बेकायदा मक्तेदारी प्रस्थापित होईल, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात मुंबईच्या विकासाचे गणित बदलण्याची, तसेच मुंबई शहरावरील भार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत