कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

संविधानाला “मंदिर” जोडणे ही संकल्पनाच अत्यंत चुकीची…व्यवस्थेला खुले पञ. ता.२२.९.२४

दिनकर रा मडकवाडे
९४२३४१८१६०

काल-पर्वा तारीख १५ सप्टें २०२४ ला म.राज्य शासनाचे वतीने ४३४ { ITI }
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान “मंदीर” लोकार्पण सोहळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था खार मुंबई उदघाटन समारंभ Online पध्दतीने मा.श्री.जयदीप धनखड उपराष्ट्रपती भारत सरकार यांचे वतीने व म.राज्याच्या प्रमुखांचे उपस्थितीत तारीख १५ सप्टें २०२४ ला सकाळी १०:३० वा Online पध्दतीने मुंबई खार येथे पार पडला..

यासाठी थोडक्यात असे की..,

संविधानाला संविधान “मंदिर” हे नांव देणे संविधानिक मुल्याच्या चौकटीत बसत नाही.

संविधान “मंदिर” ही संकल्पना. संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला हरताळ फासणारी आणि संविधानाचा अपमान करणारी आहे..

“मंदिर” ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी, देवाशी, पुजापाठाशी जोडली गेली आहे..

भारताचे संविधान सर्व धर्माचा समान आदर करणारे आहे. धर्मा धर्मात संविधान मतभेद करीत नाही..

भारतीय संविधान हे पुजापाठासाठी नाही ते लोक कल्याणकारी राज्यकारभारा साठी आहे..

आपल्या भारत देशात विविध धर्म आहेत तेव्हा संविधाना पुढे “मंदिर” हेच नांव का जोडले…?

“मंदिर” ही संकल्पना संविधानाला जोडून धार्मिक करणे आणि तेही एका धर्माचे, हे भारताचे संविधान विरोधी नाही काय..?

म.राज्याच्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक जाती धर्माचे विध्यार्थी प्रशिक्षण शिक्षण घेतात… संविधानला “मंदिर” ही संकल्पना जोडून त्या विध्यार्थ्यांना संविधाना विषयी नेमका काय अर्थ, संदेश पोहचणार आहे..?

काल-पर्वाच्या लोकसभा निवडणूक संदर्भाने काही तोंडातून संविधान बदलवूची भाषा वाफरली हे तेवढेच खरे वाचाळावर आवर नाही.. या वाचळवीरांनी संविधान भाग २० मधील कलम ३६८ या वाचाळांनी वाचावी म्हणजे शब्दप्रयोग कळेल.. संविधान बदलाची काय औकात ठेवावी लागते..?

तारीख ०९ ऑग २०१८ ला जंतर मंतर दिल्ली राजधानी येथे श्रीनिवास पाण्डेय गुरुजी यांनी संविधान जाळले..
एकाही तोंडून ब्र शब्द उच्चारला नाही… साऱ्यांना मुख असून सारे मुक्केच…?

त्यासाठी.. वरील मांडलेल्या थोडक्यात पण नेमक्या संविधानीक बाबी लक्षात घेता संविधानला “मंदिर” जोडणे ही संकल्पनाच अत्यंत चुकीची आहे ती तातडीने हटविण्यात यावी हे संविधान मुल्याची चौकटच महाराष्ट्र शासनास बजावते…?

आतातरी खालील बाबी लक्षात ध्या…!?..

थोडक्यात पण असे की…,

संविधान ७५ वर्ष वयपूर्तता महोत्सवासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्य समिती स्थापण करुन तशा विभाग जिल्हा तालुका स्तरावर सलग समित्या स्थापन करुन संविधान संमेलने चर्चा सञ संविधान तज्ञांच्या हस्ते घेण्यात येऊन लोकांत संविधान मुल्य व त्याचा अर्थ काय ते नेमके रुजवावे..

संसदेचे, विधानसभेचे अधिवेशन सञाची सुरवात संविधान उद्देशपञीका वाचनाने करावी..

सर्व माध्यमाच्या शैक्षणिक शाळा कॉलेज विद्यापिठे यात शैक्षणिक पाठ्यक्रमात संविधान पाठ्यमुल्यांचा सहभाग सुरु करावा…

संविधान उद्देशपञीकेसह संविधानातील सर्वमुल्यांचे जतन सर्वसमाजस्तरात रुजेल याची जाणं राज्य व केंद्र सरकारला असावी..

त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालय,सर्व स्वराज संस्था, विद्यापीठ, दवाखाने इथे प्रस्ताविका स्तंभ दर्शनी भागात उभारुण त्याचे जतन व्हावे..
[ विषय फार मोठा आहे शाॅर्ट घेतला ]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!