महाराष्ट्रातील रस्त्यावरील टोल हा सर्वात मोठा स्कॅम – राज ठाकरे.

टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्या कंपन्यांना टोलचं कंत्राट मिळतं कसं, असा सवालही उपस्थित करत राज ठाकरेंनी या स्कॅमची चौकशी करण्याची मागणी केली.
टोल दरवाढीवरुन मनसे पुन्हा आक्रमक झाली असून राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत टोलवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या टोलदर कमी करण्याबाबतच्या वक्तव्यांचे व्हिडिओच दाखवले. राज ठाकरे म्हणाले की, टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
राज ठाकरे म्हणाले की, टोल हा राज्यातला मोठा स्कॅम आहे, टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. छोट्या वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाके जाळून टाका, असे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. टोलचा पैसा कुठे जातो, त्याच त्या कंपन्यांना टोलचं कंत्राट मिळतं कसं, असा सवालही राज यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील या स्कॅमची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदाटोलवरूनआक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी उपोषण पुकारले होते. मनसे अध्यक्षांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत