एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार, आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिलं होतं. ‘आताही ते ( एकनाथ शिंदे ) येथे येईपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे. मी एकटा बसतो त्यांना त्यांच्या ४० जणांच्या गटाबरोबर बसू दे. पण, ते पळून का गेले? खोटं का बोलले? बेरोजगारी, परदेश दौरे, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर समोरासमोर चर्चा करू,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अडीच वर्षात मुख्यमंत्री आपल्याबरोबर चोवीस तास असायचे. म्हणून २४ तास मुख्यमंत्री घरीच बसतात, असं त्यांना वाटलं. पण, तू कोण आहे, तुला मुख्यमंत्री कशाला घाबरतील. गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री दिवस-रात्र काम करत आहेत, हे महाराष्ट्राने पाहिलं. ऑनलाईन येऊन गरम पाणी प्या, स्वत:ची काळजी घ्या, मी फक्त सल्ले देणार हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. जमिनीवर उतरून लोकांचे अश्रू पुसण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. ते काम एकनाथ शिंदे करत आहेत,” असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
“तुमचं वय किती, बोलता किती. मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे, तेवढं तुमचं वय सुद्धा नाही. तुम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व फुकट मिळालं आहे. दोन आमदारांचा बळी घेतला. त्यानंतर आमदार आणि मंत्री सुद्धा झालात. पक्ष वाढीसाठी काय करावं लागतं, तुम्हाला काय कळणार?” असा हल्लाबोल श्रीकांत शिदेंनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत