
पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान इथल्या अनेक भागांमध्ये हवामान थंड राहील, असे हवामान विभागानं म्हटले आहे. उत्तर भारतात पुढचे दोन दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पुढचे तीन दिवस ईशान्य आणि पूर्व भागांमध्ये दाट धुकं असेल, असेही हवामान विभागानं म्हटले. थंडीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काल संपलेल्या हिवाळी सुट्ट्या थंडीच्या कडाक्यामुळे अजून दोन दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पूर्व भारतात किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढेल, मात्र उत्तर भारतात किमान तापमान पुढचे पाच दिवस तसंच राहील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत