महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने चलान कापले, तर ‘ही’ आहे तक्रारीची सोपी प्रक्रिया.

ट्रॅफिक नियमांतर्गत तुम्हाला कधी कधी या माहितीचा फायदा होऊ शकतो. खरं तर सध्याच्या घडीला नियम तोडणाऱ्यांना थांबवून त्यांच्याशी बोलून चालान देण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी वाहतूक पोलीस मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ट्रॅफिक अॅपवरून थेट फोटो काढून ई-चलान पाठवतात. या प्रक्रियेत अनेक वेळा कार किंवा दुचाकी चालकांना त्यांचे चलान बजावण्यात आल्याची माहितीही नसते. नंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्यावर त्यांना चलान कापल्याचे कळते. परंतु अनेक लोक तक्रार करतात की, त्यांनी कोणत्याही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नाही आणि त्यांचे चलान चुकीचे जारी केले गेले आहे. तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करून चलान रद्द करू शकता.

जर तुम्हाला ई-चलान जारी केले गेले असेल तर ट्रॅफिक कॅमेरा किंवा पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करताना पाहिले असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने दंड आकारला गेला आहे, तर तुम्ही ट्रॅफिक चलानबाबत तक्रार दाखल करू शकता. येथे चुकीचे ई-चलान म्हणजे वाहनचालकाला असे वाटते की, आपण वाहतूक नियम मोडला नाही, तरीही त्याला चलान प्राप्त झाले, असा अर्थ होतो. चुकीच्या ई-चलानवर विवाद करण्यासाठी वाहन मालक तक्रार दाखल करू शकतो आणि दावासुद्धा करू शकतो. त्यात तो चलान चुकीच्या पद्धतीने जारी केले गेल्याचं कारणही देऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याचे वर्णन करावे लागेल आणि काही पुरावे द्यावे लागतील. हे करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!